Subramanian Swamy on PM Modi : देशाच्या इतिहासात सर्वात मोठी ऐतिहासिक घटना म्हणेज २२ जानेवारीचा प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असणार आहे. गेली अनेक दिवसांपासून हा विषय राजकीय चर्चेचा विषयदेखील ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच शंकराचार्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून मोठे वक्तव्य केले होते. आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे वक्तव्यानेदेखील खळबळ उडाली आहे. अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आहे. पत्नीशिवाय मोदी पूजा कशी काय करणार, या आशयची एक पोस्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
Since Modi without his wife cannot formally participate in six days of Prana Pratishtha Puja, and four of the revered
Scholars, the Shankaracharyas, will not be present on sixth day viz., Jan 22, I will instead participate on Sri Rama’s birthday prayers during Ram Navmi on April… — Subramanian Swamy (@Swamy39) January 16, 2024
काय म्हटले आहे सुब्रमण्यम स्वामींनी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा दिवसांच्या प्राणप्रतिष्ठा पूजेमध्ये औपचारिकमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. या सोहळ्यात चार पीठांचे शंकराचार्य या सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. तसेच, १७ एप्रिल रोजी रामनवमीच्या वेळी श्रीरामाच्या दर्शनाला मी जाणार आहे, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. याआधी डिसेंबर महिन्यातही सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर अशाच प्रकारे टीका केली होती.
डिसेंबर महिन्यात काय म्हणाले होते सुब्रमण्यम स्वामी?
“पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राम भक्तांनी परवानगी कशी दिली? रामाने १४ वर्षे वनवास भोगला, पत्नी सीतेच्या सुटकेसाठी युद्ध केले. मोदींनी मात्र आपल्या पत्नीला सोडले, अशी त्यांची ओळख आहे. मग ते पूजा कशी काय करू शकतात?”रामलल्लाची मूर्ती या मंदिरातल्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करून बसवली जाणार आहे. यानंतर आता या सोहळ्यावरून आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण रंगले आहे.
सुब्रमण्यम स्वामींच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया
सुब्रमण्यम स्वामींच्या पोस्टवर भाजपा नेत्यांची अद्यापि प्रतिक्रिया आलेली नसली तरी ज्या एक्स सोशल साईटवर त्यांनी सदर पोस्ट टाकली, त्याखाली अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काहींनी म्हटले आहे की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान मोदी यांनी तुम्हाला मंत्रिपद दिले नाही, याचे मला दुःख वाटले होते. मात्र, त्या दोघांनी किती योग्य निर्णय घेतला होता, हे आता कळतंय, असे या पोस्टवर लोकांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.






