Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Politics : महाराष्ट्र झालं, दिल्लीही झाली आता भाजपचं ‘मिशन बिहार’; लालू यादवांना धक्का देणार?

दिल्लीतील विजयानंतर भाजपचा उत्साह कमालीचा शिगेला पोहचला आहे आणि याचा थेट परिणाम बिहार निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2025 | 03:16 PM
लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश

लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : महाराष्ट्रानंतर राजधानी दिल्लीत नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपला चांगले यश मिळाले असून, 48 जागांवर विजय झाला. त्यानुसार, बहुमताचा आकडाही पार केला आहे. दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले. तर मागील दोन विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 60 पेक्षा अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. यंदा त्यांचा केवळ 22 जागांवर विजय झाला आहे. या दोन राज्यांत मिळालेल्या यशानंतर आता भाजपचं ‘मिशन बिहार’ सुरु आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपचे लक्ष असणार आहे ते म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीकडे. दिल्लीतील विजयानंतर भाजपचा उत्साह कमालीचा शिगेला पोहचला आहे आणि याचा थेट परिणाम बिहार निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदी यांनी भाषणात बिहारचा उल्लेख करत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विकासकामांचा उल्लेख केला. तेव्हाच  दिल्ली काबीज केल्यानंतर आता भाजप व रालोआचे आगामी लक्ष बिहार विधानसभा निवडणूक असल्याचे दिसून आले.

इंडिया-रालोआ थेट लढत?

बिहार विधानसभा निवडणूक एकीकडे भाजपच्या नेतृत्वात रालोआ असेल, तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलच्या नेतृत्वात इंडिया आघाडी असेल, रालोआमध्ये भाजपासोबत जदयू, लोजपा (रामविलास), हिन्दुस्तानी आवाम मोर्चा सेक्युलर आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचा समावेश आहे. तर इंडिया आघाडीमध्ये राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि विकासशील इन्सान पार्टीचा समावेश असेल.

नितीशकुमार-तेजस्वी असे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे

बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. एनडीएने २४३ विधानसभा सदस्य असणाऱ्या २२५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष समोर ठेवले आहे. परंतु बिहारची निवडणूक इतर कोणत्याही राज्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. रालोआतून मुख्य चेहरा म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणुका लढण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडी चेहरा म्हणून तेजस्वी यादव असेल.

नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचा प्रभाव

गेल्या तीन दशकांपासून बिहारच्या राजकारणावर नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव या दोन नेत्यांनी प्रभाव प्रस्थापित केला आहे. जरी लालू यादव यापुढे राजकीयदृष्ट्‌या सक्रिय नसले तरी बिहारमधील त्यांचा प्रभाव कमी झाला नाही. त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आता लालू यादव यांच्या राजकीय वारसाला पुढे आणत आहे. नितीश कुमार हे दोन दशकांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. २०१५ मध्ये त्यांनी काही महिने हे पद सोडले आणि जितन राम मांझी यांना मुख्यमंत्री बनविले. या काळात नितीश कुमार यांनी युती बदलली, परंतु मुख्यमंत्र्यांची खुर्ची त्यांच्या सोबत कायम राहिली.

Web Title: Bjp planing to win in bihar state nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Indian Political News

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
2

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.