Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तर निवडणुकीवर बहिष्कार घालणार, तेजस्वी यादव यांचं मोठं विधान

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी निवडणूक बहिष्काराच्या पर्यायावरही विचार केला जाऊ शकतो, असा थेट इशारा दिला आहे, त्यामुळे देशात खळबळ माजली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 23, 2025 | 10:39 PM
तर निवडणुकीवर बहिष्कार घालणार, तेजस्वी यादव यांचं मोठं विधान

तर निवडणुकीवर बहिष्कार घालणार, तेजस्वी यादव यांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचं राजकीय वातावरण तापू लागलं असताना, विरोधकांकडून मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी निवडणूक बहिष्काराच्या पर्यायावरही विचार केला जाऊ शकतो, असा सूचक इशारा दिला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘एकनाथ शिंदे, धनखड यांच्याबरोबर जे झालं तेच आता…’; उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर तेजस्वी यादव यांचं मोठं विधान

विरोधक एकत्र येऊन निवडणुकीवर बहिष्कार घालू शकतात का, तेव्हा तेजस्वी यादव म्हणाले, “या विषयावरही चर्चा होऊ शकते. आम्ही पाहू की जनतेची भावना काय आहे आणि इतर सर्व पक्षांची यावर काय भूमिका आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीसाठी विरोधक कोणतीही टोकाची भूमिका घेण्याची शक्यता आहे.

बिहारमधील विरोधकांमध्ये एकत्र येण्याचे आणि सरकारविरोधात प्रभावी रणनीती ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावेळी तेजस्वी यादव यांनी हे विधान केलं आहे. कोणताही निर्णय घेताना जनतेची भावना आणि सर्व घटक पक्षांच्या एकमताला प्राधान्य दिलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या बिहारमध्ये SIR म्हणजे मतदार यादी विशेष फेरपडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. निवडणूक आयोगाने 28 जून 2025 पासून ही प्रक्रिया सुरू केली असून, यात मतदार यादीतील नावांची पडताळणी व दुरुस्त्या केल्या जात आहेत. 1 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, अंतिम यादी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जाहीर होणार आहे. यामुळे निवडणूक तयारीला सुरुवात झाल्याचं स्पष्ट आहे.

मोठी बातमी! मतदार यादीतून तब्बल ५१ लाख मतदारांची नावं वगळणार, बिहारच्या राजकारणात खळबळ

दरम्यान, बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, RJD आमदार भाई वीरेंद्र यांनी केलेल्या टिप्पणीनंतर सभागृहात गोंधळ उडाला.

ही सर्व घडामोडी पाहता, येत्या काही महिन्यांत बिहारच्या राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची शक्यता असून, विरोधक निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यास ती एक ऐतिहासिक राजकीय घडामोड ठरू शकते. तेजस्वी यादव यांचे वक्तव्य हे त्याच दिशेने सूचक मानलं जातं आहे.

Web Title: Boycott of bihar election tejashwi yadav big statement latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 10:39 PM

Topics:  

  • Bihar Election
  • indian politics
  • Tejaswi Yadav

संबंधित बातम्या

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?
1

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

बिहारच्या निकालामुळे खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा अन्…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन
2

बिहारच्या निकालामुळे खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा अन्…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् ज्ञानेश कुमारांचे, मतचोरीमुळे एनडीएचा विजय; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया
3

बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् ज्ञानेश कुमारांचे, मतचोरीमुळे एनडीएचा विजय; हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.