Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर मात्र…; थेंब-थेंब पाण्यासाठी तरसणार दहशतवाद्यांचा आश्रयदाता

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने वाघा बॉर्डर बंद केली आहे. मात्र अजूनही सीमा सुरु करण्यात आलेली नाही. भारतानेआपला हा धोरणात्मक निर्णय कायम ठेवला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2025 | 02:16 PM
भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर मात्र सिंधू जल…; थेंब-थेंब पाण्यासाठी तरसणार दहशतवाद्यांचा आश्रयदाता

भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर मात्र सिंधू जल…; थेंब-थेंब पाण्यासाठी तरसणार दहशतवाद्यांचा आश्रयदाता

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदुर राबवून पाकिस्तानमधील शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण त्याला चोख उत्तर दिले. त्यानंतर दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी करण्यात आली. भारत -पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला असला तरी भारताने घेतलेले अनेक निर्णय कायम ठेवले आहेत.

सीजफायर झाले असले तरी भारताने पाकिस्तानवर घातलेले निर्बंध अजूनही कायम ठेवले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानमधील सोशल मीडिया अकाउंट बंद करणे, सिंधू जल कराराला स्थगिती देणे, व्यापार बंद करणे, वाघा बॉर्डर बंद ठेवणे अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे.

भारताने कोणते निणर्य ठेवले कायम?

वाघा-अटारी बॉर्डर बंद

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने वाघा बॉर्डर बंद केली आहे. मात्र अजूनही सीमा सुरु करण्यात आलेली नाही. भारतानेआपला हा धोरणात्मक निर्णय कायम ठेवला आहे.

पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश

भारताने पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिक आणि दूतावास अधिकाऱयांना भारत सोडण्याचे निर्देश दिले आहे. केंद्र सरकारने तो निर्णय कायम ठेवला आहे.

सिंधू जल कराराला स्थगिती

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. मात्र आता दोन्ही देशांमध्ये सिजफायरचा निर्णय झाला असला तरी भारताने हा करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान मोदींचे आक्रमक विधान

भारतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. युद्धविराम लागल्यानंतर देखील पाकिस्तानकडून तीन तासांमध्ये याचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यामध्ये चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ९ मे रोजी फोनवरून संवाद साधत दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती सांगितली जाते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

“जर तिकडून गोळी चालवली तर इकडून गोळा…; युद्धाच्या तणावपूर्ण वातावरणात पंतप्रधान मोदींचे आक्रमक विधान

मीडिया रिपोर्टनुसार, या संवादावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी व्हान्स यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेत ठणकावून भूमिका घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आल्यास भारत देखील जोरदार प्रत्युत्तर देईल पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला भारताचं प्रत्युत्तर अधिक कठोर असेल, असं पंतप्रधान मोदीनी जेडी व्हान्स यांना सांगितले.

दिल्लीमध्ये हालचालींना वेग

तणावपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर आता दिल्लीमध्ये बैठकीचा वेग वाढला आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जात आहे. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Ceasfire between india pakistan but modi government stay induswater treaty marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • Indus Waters
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral
1

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.