
मोठी बातमी! सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारने मागितला वेळ? CJPचा मोठा दावा
दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले, “सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. मात्र जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.”
याचदरम्यान कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेत महत्त्वाची प्रगती झाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या बैठकीत CJPच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. जवळपास एक तास चाललेल्या बैठकीत आंदोलनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
CJP Meeting Govt Meeting: धर्मेद्र प्रधान राजीनामा देणार? CJPसोबत केंद्राची मिटींगबाबत मोठी अपडेट
बैठकीदरम्यान CJPने केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. पक्षाच्या म्हणण्यानुसार, सरकारने त्यापैकी दोन मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या आहेत. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
CJPने स्पष्ट केले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पक्ष ठाम असून ही मागणी मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही. सरकारने या विषयावर निर्णय घेण्यासाठी उद्या (दुपारपर्यंत) वेळ मागितला आहे. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारची अधिकृत भूमिका CJPला कळवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या घडामोडींमुळे धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, CJPने सरकारच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला असून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेनंतर पक्षाने महत्त्वाचे दावे केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतची मुदत मागितली आहे. रांका यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार धर्मेंद्र प्रधान यांना लवकरच पदावरून दूर करेल, अशी आशा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सरकारसोबत झालेल्या चर्चेत काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, CJPने मांडलेल्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामध्ये NEET प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसानभरपाई देणे आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे तसेच इतर कायदेशीर खटले मागे घेणे या मागण्यांचा समावेश आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून, त्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितल्याचे रांका यांनी स्पष्ट केले. सरकारचा अंतिम निर्णय आल्यानंतर पुढील भूमिका जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या घडामोडींमुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.