
El Nino
अल निनो ही प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याच्या तापमानाशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. सोप्या भाषेत सांगयाचे झाले तर या प्रक्रियेत प्रशांत महासागरातील पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होते. या उष्ण पाण्यामुळे हवामानातही बदल होते, ज्याचा संपूर्ण जगातीव पावसावर परिणाम होतो. भारतात अल निनो आला म्हणजे पाऊस कमी पडतो.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, यंदा पावसाळा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये वेळेवर पोहोचला असला तरी पावसाची तीव्रता कमी असू शकते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामानिळनाडूत पुढे काही दिवस पावासाचे आगमन होईल. परंतु तो जोरदार बरसण्याची शक्यता कमी आहे. ज्याचा थेट शेतीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे खरीप पिकांसाठी धोका निर्माण झाला आहे. कारण खरीप पिंकाना जास्त पावसाची गरज असते.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटू शकते. ज्यामुळे भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे युरोप खंडातही परिस्थिती बिकट होऊ शकते. वाढत्या उष्णतेमुळे मानवी आरोग्यवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
अल निनोमुळे यंदा पावसाची तीव्रता कमी वर्तवली आहे. ज्यामुळे भाजीपाला, डाळी, धान्याचे भाव वाढू शकतात. तसेच पाणीटंचाईचा प्रश्न देखील उद्भवू शकतो. यामुळे वीजनिर्मितीवरही परिणाम होऊ शकतो. सामान्यांच्या रोजच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन आर्थिक भार वाढू शकतो.