Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नभ: स्पर्श दीप्तम! नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार; IAF ची विशेष विमाने थेट…; मोदी सरकारचा निर्णय

नेपाळमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे तेथील काठमांडू एअरपोर्ट कधी सुरू होणार हे कोणालाच सांगता येणार नाही. भारत सरकारने नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2025 | 06:42 PM
नभ: स्पर्श दीप्तम! नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार; IAF ची विशेष विमाने थेट…; मोदी सरकारचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

नेपाळमध्ये लवकरच होणार सत्तापालट
केंद्र सरकार राबवणार विशेष अभियान
भारतीयांना मायदेशी आणले जाणार

Nepal Crisis: नेपाळमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. सरकारने सोशल मिडियावर बंदी घातली आणि त्यानंतर नेपाळमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले. आंदोलन एवढे मोठे झाले की सरकारने सोशल मिडियावर घातलेली बंदी मागे घेतली. मात्र या आंदोलनाचे रूपांतर हिंसाचारात झाले. नेपाळमध्ये अस्तीवत असलेले सरकार बरखास्त झाले. तिथली परिस्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नेपाळमधील भारतीयांना मायदेशी परत आणले जाणार आहे.

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा दिला. राजीनामा देताच ते दुबईत शरण घेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारांमुळे विमानसेवा खंडीत झाली आहे. काठमांडू विमानतळ बंद आहे. भारत-नेपाळ सीमेवर बंदोबस्त वाढवला गेला आहे. पश्चिम बंगालमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान तिथे अडकलेल्या भारतीयांना आता मायदेशी परत आणले जाणार आहे.

नेपाळमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे तेथील काठमांडू एअरपोर्ट कधी सुरू होणार हे कोणालाच सांगता येणार नाही. आता भारत सरकारने नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. काठमांडू एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद असल्याने शेकडो भारतीय नागरिक तिथे अडकून पडले आहेत.

नेपाळमधील अडकलेल्या बहरतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय वायुसेनेचे दोन विशेष विमाने केंद्र सरकार नेपाळमध्ये पाठवणार आहेत. हवाई दलाच्या विमानाने नेपाळमधील भारतीयांना दिल्लीत आणले जाणार आहे. काठमांडू एअरपोर्टवर अडकलेल्या भारतीयांना दिल्लीत आणले जाणार आहे. भारत सरकार नेपाळमधील स्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील आंदोलककाना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Nepal Violence: नेपाळमधील ४८ तासांच्या हिंसाचारानंतर नेपाळ लष्कराच्या हाती देशाची कमान; गेल्या दोन दिवसांत काय काय घडलं?

४८ तासांच्या हिंसाचारानंतर नेपाळ लष्कराच्या हाती देशाची कमान

गेल्या दोन दिवसांपासून शेजारील देश नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला आहे. नेपाळ सरकारने देशातील सोशम मीडियावर बंदी घातल्यामुळे नेपाळमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सरकारविरोधी निदर्शनांमध्ये, निदर्शकांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला आणि संसद भवनासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या घरांना आग लावली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा देत देशातून पलायन केले. पण त्यानंतर मात्र नेपाळ लष्कराने देशाची सुत्रे हाती घेतली आहेत. लष्कराकडून देशात परिस्थिती निंयत्रणात आणण्यासाठी काम सुरू आहे. तर दुसरीकडे नेपाळमध्ये अंतरिम सरकारसाठी नव्या नावांची चर्चाही सुरू झाली हे.

 

Web Title: India modi government send indian air forces rescue evacuation indian citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • India Government
  • Indian Air Force
  • nepal

संबंधित बातम्या

Sushila Karki : नेपाळच्या माजी सरन्यायाधीश बनणार अंतरिम पंतप्रधान? कोण आहेत सुशीला कार्की ज्यांचा भारताशीही संबंध
1

Sushila Karki : नेपाळच्या माजी सरन्यायाधीश बनणार अंतरिम पंतप्रधान? कोण आहेत सुशीला कार्की ज्यांचा भारताशीही संबंध

Nepal News : नेपाळ चीनमध्ये छापून घेतो आपली currency; जाणून घ्या काय आहे यामागचं रंजक कारण?
2

Nepal News : नेपाळ चीनमध्ये छापून घेतो आपली currency; जाणून घ्या काय आहे यामागचं रंजक कारण?

WeAreFire : ‘उत्कटतेच्या ज्वाला…’ ‘या’ नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL
3

WeAreFire : ‘उत्कटतेच्या ज्वाला…’ ‘या’ नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL

नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत
4

नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.