भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात (फोटो -सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर अशा महत्वाच्या ठिकाणी हल्ला केला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने ऑल आउट वॉरची घोषणा केली आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केला आहे.
लाहोरवर ड्रोनने मोठा हल्ला
भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत. भारताने लाहोरवर ड्रोनने मोठा हल्ला केला आहे. याआधी पाकिस्तानने जम्मू, राजस्थान, पंजाब, गुजरात इत्यादी ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. तथापि, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हवेतच पाडले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्कर प्रमुखांची चर्चा
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने त्यांचे नापाक हल्ले सुरु केले आहेत. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. भारताने पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर भारताकडून देखील आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. भारताने लाहोरमध्ये हल्ला केला आहे. भारताने लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे. यानंतर दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे.
आजची रात्र पाकिस्तानसाठी अखेरची! ‘नापाक’ हल्ल्यानंतर PM मोदी ॲक्शन मोडमध्ये, महत्वाचा निर्णय होणार
गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या अयशस्वी हल्ल्याच्या प्रयत्नानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. सिंह यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांकडूनही अपडेट्स घेतले. तिकडे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि महत्वाच्या नेत्यांमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. आज रात्री भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे पहावे लागणार आहे.याआधीही भारताने पाकिस्तानकडून येणारे अनेक रॉकेट नष्ट केले होते. पाकिस्तानने भारतातील १५ शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने सर्व हल्ले हाणून पाडले.
पाकिस्तानने मिसाईल डागून जम्मू काश्मीर एअरबेस, पोखरण, अशा भारतीय सैन्य दलांच्या मुख्य ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या एस- 400 या यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले हवेतल्या हवेतच परतवून लावले. मात्र त्यानंतर भारताने देखील चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. काही ठिकाणी जोरदार उत्तर दिले जात आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानचे एक F- 16 लढाऊ जेट पाडले आहे. सीमेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना लष्कराच्या एयर डिफेन्स तुकड्यांनीही प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी पाकिस्तानने जम्मूमधील एका हवाई तळावर रॉकेट डागले होते. मात्र भारतीय सेनेच्या सतर्कतेमुळे शत्रू सफल नाही झाले.