Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manipur Violence: मणिपूरमध्ये NPP ने पाठिंबा काढून घेतल्याने बिरेन सरकार अडचणीत! आता सरकारची काय असणार भूमिका?

National People Party: हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी तीन महिला आणि तीन मुलांची निर्घृण हत्या केली होती. नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2024 | 12:45 PM
मणिपूरमध्ये NPP ने पाठिंबा काढून घेतल्याने बिरेन सरकार अडचणीत! आता सरकारची काय असणार भूमिका? (फोटो सौजन्य-X)

मणिपूरमध्ये NPP ने पाठिंबा काढून घेतल्याने बिरेन सरकार अडचणीत! आता सरकारची काय असणार भूमिका? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मणिपूरमधील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण असल्याची पाहायला मिळत आहे. हे राज्य एका वर्षाहून अधिक काळ हिंसाचाराने ग्रस्त असले तरी एनपीपीने पाठिंबा काढल्यामुळे पुन्हा एकदा बिरेन सरकारचा ताण वाढला आहे. नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) बिरेन सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. अशा परिस्थितीत एनपीपीने पाठिंबा काढून घेतल्याने मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची खुर्ची गमवावी लागेल का? काय असणार सरकारची भूमिका? पाहा सविस्तर बातमी…

हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील आताची परिस्थिती पाहता नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. गेल्या काही दिवसांत मणिपूरमधील परिस्थिती बिघडल्याचे एनपीपीने म्हटले आहे. अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिरेन सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची खुर्ची धोक्यात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, नदीत सापडले तीन मृतदेह , 13 आमदारांची घरे जाळली

एनपीपीने पाठिंबा काढून घेतला

मणिपूरमधील ताजी परिस्थिती पाहता नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूरच्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. हिंसाग्रस्त मणिपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यात बिरेन सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे एनपीपीने म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात एनपीपीने दावा केला आहे की, गेल्या काही दिवसांत मणिपूरमधील परिस्थिती बिघडली आहे. अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तसेच 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत एनपीपीचे सात आमदार आहेत. दरम्यान एनपीपीने पाठिंबा काढून घेतल्याने बीरेन सरकारला काहीही फरक पडणार नाही कारण एनडीएच्या एकूण आमदारांची संख्या 53 आहे. यापैकी भाजपच्या आमदारांची संख्या ३७ आहे तर नागा पीपल्स फ्रंटला (NPF) पाच आमदारांचा, JDUचा एक आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे पाच तर केपीएचे दोन आमदार आहेत. यापूर्वी, कुकी पीपल्स पार्टीने (केपीए) जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या एनडीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.

मणिपूरमध्ये हिंसाचार का झाला?

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. हिंसक निषेधाच्या ताज्या घटना शनिवारी (16 नोव्हेंबर) रात्री घडल्या. जिरीबाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी तीन महिला आणि तीन मुलांची हत्या केली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी १६ नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केला. त्यांची घरे जाळण्यात आली. मंत्री आणि आमदारांच्या गाड्या जाळण्यात आल्या. यानंतर राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. सात जिल्ह्यांत इंटरनेट सेवा ठप्प झाली. अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला.

अमित शहा यांनी घेतला आढावा

मणिपूरमधील सद्यस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी उत्तर-पूर्व राज्यात शांतता सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलण्याचे निर्देश उच्च अधिकाऱ्यांना दिले. मणिपूरमधील सद्यस्थितीचा अंदाज तुम्हाला गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व सभा रद्द करून अचानक नागपुरातून दिल्लीत आल्यावरून येऊ शकतो. दिल्लीत आल्यानंतर शाह यांनी अधिकाऱ्यांसोबत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यासंदर्भात बैठक घेतली.

मणिपूर जातीय संघर्षाशी झगडत

मणिपूर गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वांशिक संघर्षाशी झुंजत आहे. मणिपूरमधील बहुसंख्य मेईतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ मणिपूरच्या पहाडी जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी ३ मे रोजी आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आल्यानंतर जातीय हिंसाचार झाला. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारात कुकी आणि मेईतेई समुदायातील 220 हून अधिक लोक आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले आहेत.हजारो लोक बेघर झाले असल्याची माहिती मिळत आहे.

Baba Siddiqui Case : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट; अकोल्यातून आणखी एकाला अटक

Web Title: National people party withdraws support to manipur government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • BJP
  • Manipur Violence

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.