Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकशाहीचा आवाज दडपला जातोय? राहुल गांधी सभागृहात का संतापले

लोकसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला भाषण करू दिले जात नाही किंवा कोणत्याही विषयावर मत व्यक्त करू दिले जात नाही', अशा प्रकारचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यामुळे चर्चेला विषय मिळाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 29, 2025 | 01:12 PM
राहुल गांधींना काळे फासण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची थेट धमकीच

राहुल गांधींना काळे फासण्याची ठाकरे गटाच्या नेत्याची थेट धमकीच

Follow Us
Close
Follow Us:

नवी  दिल्ली : लोकसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला भाषण करू दिले जात नाही किंवा कोणत्याही विषयावर मत व्यक्त करू दिले जात नाही’, अशा प्रकारचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यामुळे एका नव्या चर्चेला विषय मिळाला आहे. अर्थात, राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील सर्व सदस्यांनी नियमांचे पालन करून सभागृहाचे पावित्र्य जपायला हवे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आहे. एक प्रकारे राहुल गांधी यांच्याकडून काही नियमांचा भंग झाल्यामुळे त्यांना अशा प्रकारे बोलू दिले जात नाही असा युक्तिवाद अप्रत्यक्षपणे ओम बिर्ला यांनी केला आहे. अर्थात, कोणत्या नियमांचा भंग केला आणि त्यामुळे लोकसभागृहाच्या पावित्र्याला धक्का पोहोचला याची माहितीच नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

हे देखील वाचा : भारताच्या सुरक्षेसाठी कठोर इमिग्रेशन कायदा; ममता सरकारवर घुसखोरीला प्रोत्साहन दिल्याचा ठपका

लोकसभेचे कामकाज कशाप्रकारे चालावे याबाबत जो ३४९ क्रमांकाचा नियम आहे त्यामध्ये लोकसभेतील सदस्यांनी सभागृहात कशाप्रकारे वर्तन ठेवावे याची मोठी यादी सांगण्यात आली आहे. त्या यादीतील कोणत्या नियमाचे पालन करण्यात राहुल गांधी अपयशी ठरले याचा कोणताही खुलासा ओम बिर्ला यांनी केला नाही. पण राहुल गांधी यांनी जेव्हा लोकसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला बोलायला मिळावे अशी मागणी केली तेव्हा त्यांनी लोकसभेचे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षनेते असो किंवा इतर सदस्य असो त्यांनी काही किमान नियमांचे पालन करावे अशा प्रकारची अपेक्षा ओम बिर्ला यांनी व्यक्त केली असली तरी त्यामुळे कोणताही स्पष्ट खुलासा झालेला नाही, उलट संभ्रम वाढला आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांना महाकुंभमेळावर बोलायचे होते, तसेच देशातील बेरोजगारीच्या विषयावर त्यांना भाषण करायचे होते. पण या दोन्ही विषयांवर आपल्याला बोलण्याची परवानगी मिळाली नाही असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

सभागृह लोकशाही मार्गाने चालवले जात नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांवर केला आहे. गृहात एखाद्या विषयावर जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या सदस्य संख्येच्या प्रमाणात काही मिनिटे चर्चेमध्ये बोलण्यासाठी दिली जातात. राहुल गांधी यांच्या पक्षाची सदस्य संख्या किंवा त्यांना मिळालेले विरोधी पक्ष नेतेपद पाहता नेहमीच त्यांना भाषणासाठी जास्त कालावधी दिला जातो किंवा विरोधी पक्ष नेत्याला जास्त कालावधी देण्याची प्रथाही आहे.

हे देखील वाचा : West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात हिंसाचार; ३४ जणांना अटक, इंटरनेटही बंद

पण गेल्या काही कालावधीपासून राहुल गांधी यांनी सभागृहात कोणते मुद्दे मांडू नयेत याच दिशेने कामकाज सुरू असल्याचे दिसते. किमान तसा आरोप तरी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. विरोधी पक्षाचा सभागृहामध्ये योग्य सन्मान राखला जात नाही अशी तक्रारही काँग्रेसच्या सत्तर खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे. काही वर्षांच्या कालावधीपासून लोकसभेचे व्यासपीठ असो किंवा इतर प्रतिनिधीगृहांची व्यासपीठ असोत तेथे गोंधळ करणे हाच एक कलमी कार्यक्रम राबवला जातो आणि सर्वसाधारणपणे हा गोंधळ विरोधी पक्षांकडून अपेक्षित असला तरी अनेक वेळा सत्ताधारी पक्षांच्या सदस्याकडूनही गोंधळाचे नियोजन केले जाते.

Web Title: New debate sparked by rahul gandhis allegation of not being allowed to speak in lok sabha nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Congress
  • Loksabha Speaker
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
1

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics: ‘धारावी ते बारामती’ महाविकास आघाडीच्या ‘बिघाडी’ची चर्चा, काँग्रेस आणि उबाठामधील ‘धुसफूस’ चव्हाट्यावर
2

Maharashtra Politics: ‘धारावी ते बारामती’ महाविकास आघाडीच्या ‘बिघाडी’ची चर्चा, काँग्रेस आणि उबाठामधील ‘धुसफूस’ चव्हाट्यावर

भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द करा; नसीम खान यांची मागणी
3

भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द करा; नसीम खान यांची मागणी

बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही, तर…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
4

बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही, तर…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.