Pahalgam Terror Attack: भारताच्या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट? आर्मी PM शरीफांची हकालपट्टी करणार? वाचा...
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याला एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानचा बदला घेण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. तसेच युद्धाभ्यास देखील सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता आहे.
भारत पाकिस्तानवर हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी सैन्याचा दबदबा सरकारवर वाढल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या भीतीने पाकिस्तानमधील सर्व मोठे निर्णय सेनाच घेत असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी सेना आणि सरकारमध्ये तणाव असल्याचे सांगितले जात आहे. आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांना पंतप्रधान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पाकिस्तान सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनिर देश सोडून पळून गेल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे सैन्य प्रमुख परिवारासह देश सोडून गेल्याचे म्हटले जात आहे. तसेच रावळपिंडी येथील सैन्य मुख्यालयात लपले असल्याची चर्चा सुरू आहे. भारताने आक्रमक पावले उचलली असल्याने पाकिस्तानमध्ये भीतीदायक वातावरण आहे.
भारताने आक्रमण युद्धाभ्यास सुरू केला आहे. नौदलाची ताकद असलेले आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात आहे. भारतीय लष्कर देखील मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. राफेल आणि सुखोई लढाऊ विमाने सीमेजवळ घिरट्या घालत आहेत. त्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे. भारताला उत्तर देण्याची तयारी करत आहे. मात्र अखेरच्या क्षणी पाकिस्तान आर्मी सरकारवर दवाब आणून काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची खुर्ची राहणार की जाणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.
NIA च्या तपासात मोठा खुलासा
गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताने अनेक महत्वाची पावले उचलून पाकिस्तानची कोंडी केली आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. एनआयएच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
Pahalgam Terror Attack: पहलगाम नव्हे तर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती ‘ही’ ठिकाणे; NIA च्या तपासात मोठा खुलासा
एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तिथे घटनास्थळी केलेल्या चौकशीत दहशतवादी बैसरन खोऱ्यात नव्हे तर अन्य ठिकाणी रक्तपात करू इच्छित होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपले टार्गेट बदलले आणि बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला. हल्ला करण्याच्या 2 दिवस आधीपासूनच दहशतवादी बैसरन खोऱ्यात उपस्थित होते.