Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धबंदीची घोषणा झाल्यावरही पाकिस्तानकडून उल्लंघन,भारताचे जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे खोटे दावे

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचे जाहीर करण्यात आली असली, तरी पाकिस्तानचे त्यानंतर काही तासातच युद्धबंदीचे उल्लंघन करत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर शहाबाज शरीफ यांनी आणेक खोटे दावे केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 11, 2025 | 07:56 AM
Shahbaz Sharif (फोटो सौजन्य: social media)

Shahbaz Sharif (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (१० मे) उशिरा युद्धबंदी जाहीर करण्यात आली असली, तरी पाकिस्तानने त्यानंतर काही तासांतच युद्धबंदीचे उल्लंघन करत पुन्हा एकदा आपल्या कुरापतीखोर स्वभावाचे दर्शन घडवले. अनेक तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली. मात्र युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन (Pakistan Violates Ceasefire) केले. नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानी सैन्याकडून केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारताने ठोस प्रत्युत्तर दिले असून, सर्व ड्रोन हल्ले भारतीय लष्कराने यशस्वीपणे परतवून लावले.

Operation Sindoor: युद्धविरामापूर्वी भारताने पाकिस्तानला शिकवला ‘धडा’, राफेलने उडवली झोप, नक्की काय मिळाले?

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीन, सौदी अरेबिया, तुर्की, ब्रिटन, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आणि इतर अनेक व्यक्तिमत्त्वे आणि सहयोगी देशांचे भारतासोबत अलिकडेच झालेल्या युद्धबंदीसाठी केलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले असले तरी त्यांनी आपल्या छुपा अजेंडा कायम ठेवत युद्धबंदीचे उल्लंघन केलं आहे.

या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या देशातील जनतेला संबोधित करत भारतावर निराधार आरोप केले. त्यांनी दावा केला की, पाकिस्तानने भारताच्या राफेल लढाऊ विमानांना पाडले असून, भारताने त्यांच्या प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण केला आहे. मात्र भारतीय लष्कराने स्पष्ट केले की, त्यांनी फक्त दहशतवादी अड्डे आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले असून नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवलेली नाही.

शाहबाज शरीफ यांची बढाई
शाहबाज शरीफ यांनी लष्करी प्रतिष्ठाने आणि जलसाठ्यांवर हल्ला केल्याचे खोटे दावे केले. सोबतच त्यांनी बढाई मारली, “आम्ही शत्रूला अशा भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे जी त्याला चांगली समजते. आम्ही स्पष्ट केले आहे की ज्या बैठका टेबलावर घ्यायच्या होत्या त्या आता युद्धभूमीवर होतील.”

पाकच्या पंतप्रधानांचा खोटा दावा
शाहबाज शरीफ यांनी खोटा दावा करत म्हटले आहे की, “भारताने आपल्या अहंकारात आपली प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.”ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे निष्पाप लोक, मशिदी आणि नागरी लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले आणि आमच्या संयमाची परीक्षा घेण्यात आली.” तर भारतीय सैन्याने स्पष्टपणे सांगितले की त्यांनी फक्त दहशतवादी अड्डे आणि लष्करी तळांना लक्ष्य केले.

Bharat-Pakistan Ceasefire LIVE Updates:पाकिस्ताने खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, युद्धबंदीच्या काही तासातच राजौरीमध्ये पुन्हा सुरू

Web Title: Pakistan violates ceasefire despite announcement india responds strongly pakistan pms false claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 07:56 AM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान
1

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.