PM मोदींचं जिनिव्हात भाषण : 'वन वर्ल्ड फॉर हेल्थ' थीमअंतर्गत जगासमोर मांडला भारताचा आरोग्यदृष्टीकोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणवरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही गरिबांना खोटी आश्वासनं दिली नााहीत. आम्ही खरा विकास केला आहे. गरिबांचं दु:ख , सामान्य माणसांचा त्रास, मध्यवर्गीयांची स्वप्न असंच कळत नाहीत. त्यासाठी ध्यास लागतो आणि मला दु:खानं सांगावं लागतंय की काही लोकांमध्ये तो नाही.
मोदी म्हणाले, ‘आम्ही 12 कोटींपेक्षा जास्त शौचालयं बनवली. त्यामुळे आई आणि बहिणींच्या अडचणी दूर झाल्या. काही जणांचा फोकस जकूजीवर आहे. स्टायलिश शॉवरवर आहे. पण, आमचा फोकस प्रत्येक घरी पाणी पोहचवण्यावर आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला असल्याचं मानलं जात आहे.
पंतप्रधानांनी पुढं सांगितलं, ‘जेव्हा जास्त ताप वाढतो त्यावेळी लोकं काहीही बोलतात. पण जेव्हा हताशा- निराशा पसरते त्यावेळी देखील खूप बोलतात. ‘इतके लाख घोटाळे, इतके लाख घोटाळे’ यापूर्वी वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स असतं. 10 वर्ष झाली. पण, घोटाळे झाले नाहीत. त्यामुळे लाखो कोटी वाचले आहेत. ते लोकांच्या सेवेसाठी वापरले जात आहेत. ‘आपल्या देशाचे एक पंतप्रधान होते. त्यांना मिस्टर क्लीन म्हणण्याची सवय झाली होती. त्यांनी एक अडचण ओळखली होती. त्यांनी सांगितलं होतं की, ‘दिल्लीमधून एक रुपया निघतो त्यामधील 15 पैसे गावापर्यंत पोहोचतात.
त्यावेळी पंचायत ते पार्लमेंटपर्यंत एकाच पक्षाचं राज्य होतं. पण, अद्भूत हाथ सफाई होती. 15 पैसे कुणाकडं जात होते ते तुम्ही सहज ओळखू शकता. देशानं आम्हाला संधी दिली. आम्ही उत्तर शोधण्याचं काम केलं. आमचं मॉडेल बचत आणि विकास आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी आहे.
मोदींनी आपल्या भाषणात राजीव गांधींचाही उल्लेख केला. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, “मी त्यांचा राग समजू शकतो. आपल्या देशात एक पंतप्रधान असायचे. त्यांना मिस्टर क्लीन म्हणणे फॅशनेबल झाले होते. त्यांनी म्हटले होते की जर दिल्लीतून एक रुपया बाहेर पडला तर , तर फक्त १५ पैसे गावांमध्ये जातात. ते पोहोचते. त्या वेळी पंचायतीपासून संसदेपर्यंत एकाच पक्षाचे राज्य होते. त्यावेळी त्यांनी जाहीरपणे म्हटले होते की एक रुपया बाहेर येतो आणि १५ पैसे पोहोचतात. ते खूप छान होते. युक्ती. १५ पैसे कोणाकडे गेले? … देशातील सामान्य माणूसही हे सहज समजू शकतो.”
पंतप्रधानांनी अरविंद केजरीवाल यांच्या ‘शीशमहाल’चाही उल्लेख केला. ते म्हणाले, “आजकाल माध्यमांमध्ये खूप चर्चा आहे, सोशल मीडियावर जास्त. काही नेते घरांमध्ये जकूझी आणि स्टायलिश शॉवरवर लक्ष केंद्रित करत आहेत, परंतु आमचे लक्ष प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यावर आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही समस्या ओळखून नंतर ती सोडवू शकत नाही. समस्या सोडवणे देखील आवश्यक आहे. आमचा प्रयत्न समस्या सोडवण्याचा आहे आणि आम्ही आमचे प्रयत्न समर्पणाने करतो.”