pond in Rewa village in Madhya Pradesh has been stolen and a police complaint has been filed
MP village Lake stolen : मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमधील एका गावामध्ये अजब घटना समोर आली आहे. रीवा गावामधील एक तलाव चक्क चोरीला गेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मध्य प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. लाखो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेला तलाव चक्क चोरीला गेला आहे. यामुळे मध्यप्रदेश पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यांच्याकडून तलावाची शोध मोहिम सुरु आहे.
चोरट्यांकडून सहसा मौल्यवान दागिने, पैसे, हिरे आणि मोती यांच्यावर डल्ला मारला जातो. चोरांचे लक्ष हे पैशांवर जास्त असते. मात्र मध्यप्रदेशामध्ये पैशांची नाही तर चक्क सार्वजनिक तलाव चोरीला गेला. माहिती अधिकारांतर्गत असे उघड झाले आहे की हा तलाव सुमारे २५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. आता गावकरी तलावाच्या शोधात भटकत आहेत. त्यांनी प्रशासन, पोलिस आणि मुख्यमंत्र्यांकडे अपील केले आहे, परंतु तलाव सापडला नाही. यामुळे कंटाळलेल्या ग्रामस्थांनी घोषणा करून तलाव शोधून देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हे प्रकरण रेवा जिल्ह्यातील चकपट येथील आहे. आरटीआय कार्यकर्ते ललित मिश्रा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमृत सरोवर तलाव ९ ऑगस्ट २०२३ रोजी २४.९४ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता. तो पूर्वा मणिराममधील कठौली गावाच्या ठिकाणी बांधण्यात आला आहे. जो महसूल नोंदीनुसार जमीन क्रमांक ११७ वर नोंदवला गेला आहे. खर्च करुन तलाव बांधण्यात आला आहे तर त्या जागेवर आता कोणताही तलाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाखो रुपये खर्च करुन तलाव तयार करण्यात आला. मात्र नोंदणी केलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचा तलाव बांधण्यात आलेला नाही. त्याऐवजी, ग्रामपंचायतीच्या सरपंचाने नाल्यावर बांध बांधला आणि त्यांच्या स्वतःच्या खाजगी जमिनीत, क्षेत्र क्रमांक १२२ मध्ये पाणी साठवले. पाणी जमा होताच, ते तलाव म्हणून दाखवून तेथून २४ लाख ९४ हजार रुपये काढून घेण्यात आले. त्यामुळे तलावाची चोरी ही भ्रष्टाचारातून झाली असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तक्रारीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पंचायत रेवा यांनी अमृत सरोवर तलावाची संपूर्ण रक्कम एका आठवड्यात ग्रामपंचायतीकडून वसूल करण्याचे निर्देश दिले, परंतु सरपंचाने सरकारची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक जमिनीचा एक छोटासा भाग सरकारला दान केला.
स्टेशन प्रभारी चकपत घनश्याम तिवारी म्हणाले की, तलाव चोरीची तक्रार आली आहे. ही अनियमिततेची घटना आहे. जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांनी चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले आहेत. पूर्वा मणिराम धीरेंद्र तिवारी सरपंच सध्या भाजपचे रायपूर मंडळ उपाध्यक्ष देखील आहेत. याशिवाय, परिसरातील अनेक तलाव देखील रात्रीतून गायब झाले. सरोवराचा शोध सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आणि ते बक्षीस देऊन मदत मागत आहेत. पोलिस आणि प्रशासन तपासात गुंतले आहे, परंतु सरोवर काही सापडत नाही.