
महागाईत होणार वाढ
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक अनेक वस्तूंचे दर वाढताना दिसत आहे. त्यातच सणासुदीच्या तोंडावरच किराणा आणि खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये अचानक वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. रोजच्या जेवणाचा खर्च वाढला असून, येत्या सणासुदीत मिठाईही महाग होण्याची चिन्हे आहेत.
तूर, मूग, उडीद यांसह हरभरा डाळीच्या किमतीतही वाढ झाली आहे. उत्पादन आणि पुरवठ्यातील चढ-उतारांमुळे डाळी महाग राहिल्या आहेत. साखर, तूर, उडीद आणि हरभरा डाळींच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात जाणवू लागला आहे. तांदूळ, सोयाबीन तेल, बेसन आणि मैदा यांच्या किमतीही वाढल्या आहेत.
चहा, डाळी, मिठाई आणि नाश्त्याच्या अनेक पदार्थांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कुटुंबाचे मासिक बजेट बिघडले आहे. मागील पाच महिन्यांत रोजच्या वापरातील अनेक आवश्यक किराणा वस्तूंच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे बाजारातील चित्र आहे.
मिठाई महागण्याची शक्यता
सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास आगामी सणांमध्ये मिठाईचे दर वाढू शकतात. साखरेचे दर सुमारे २५ टक्क्यांनी वाढले आहेत. बाजारातील उपलब्ध साठा कमी असणे, मागणी कायम राहणे आणि पुरवठ्यावर ताण वाढणे ही प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे. इथेनॉल धोरणामुळे उसाचा काही भाग इथेनॉल निर्मितीकडे वळत असला तरी केवळ त्यामुळंच साखर महाग झालेली नाही, असेही ते सांगतात.
डाळींमुळे वाढला खर्च
तूर डाळ रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असताना हरभरा डाळीपासून बेसन, फरसाण, लाडू, मिठाई आणि अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे हरभरा डाळ महागल्याने या सर्व उत्पादनांचा खर्च वाढत आहे. तूर, मूग, उडीद यांसह हरभरा डाळीच्या किमतीतही वाढ झाली आहे. उत्पादन आणि पुरवठ्यातील चढ-उतारांमुळे डाळी महाग राहिल्या आहेत.
मिठाईचे दर वाढण्याची शक्यता
साखर आणि हरभरा डाळ दोन्ही महागल्याने बेसन लाडू, मोतीचूर लाडू, म्हैसूर पाक, बर्फी आदी मिठाईंची उत्पादन किंमत वाढली आहे. कच्च्या मालाचे दर कमी न झाल्यास रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि दिवाळी दरम्यान मिठाईचे दर वाढण्याची शक्यता आहे.
दिलासादायक ! ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात; थेट 200 रुपयांनी झाला स्वस्त