घाऊक महागाई सलग चौथ्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये 2.13 टक्क्यांवर पोहोचली. मागच्या ११ महिन्यांमधली ही सर्वोच्च पातळी आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे अन्न आणि अखाद्य वस्तूंच्या किमती वाढल्या.
भाजीपाल्याचे दर वार्षिक आधारावर २८.९६ टक्क्यांनी घसरले. आरबीआयने रेपो दर ५.५ टक्के कायम ठेवला असला तरी हंगामी आणि पावसाळी प्रभावांमुळे ऑगस्टमध्ये महागाई पुन्हा वाढू शकते.