Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉंग्रेसच्या कपाळावरील ‘हे’ पाप कधीही धुतले जाणार नाही ; नरेंद्र मोदींचा कॉंग्रेसवर घणाघात

आज संविधानावरील चर्चेदरम्यान आणीबाणीची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी नेहरु गांधी कुटुंबियांनी संविधानाशी छेडछाड केल्याचा आरोपही केला.

  • By नारायण परब
Updated On: Dec 14, 2024 | 08:08 PM
कॉंग्रेसच्या कपाळावरील ‘हे’ पाप कधीही धुतले जाणार नाही ; नरेंद्र मोदींचा कॉंग्रेसवर घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी संविधानावरील चर्चेदरम्यान आणीबाणीची आठवण करून देत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी आणीबाणीमुळे कॉंग्रेसच्या कपाळावरील पाप कधीच धुतले जाणार नाही असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर जहरी टीका केली. पंतप्रधान आपल्या या भाषणात म्हणाले,  25, 50 आणि 75 वर्षांना प्रत्येक देशात खूप महत्त्व असते. पण ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळून 25 वर्षे पूर्ण होत असताना आपल्या देशात संविधान हिसकावले गेले होते. देशात आणीबाणी लागू करण्यात आली आणि घटनात्मक व्यवस्था रद्द करण्यात आली. देशाचे तुरुंगात रूपांतर झाले. नागरिकांचे हक्क हिरावले गेले काँग्रेसच्या कपाळावरील हे पाप कधीच धुतले जाणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले,  जगात ज्यावेळी लोकशाहीची चर्चा केली होईल. काँग्रेसच्या या पापाची चर्चा नक्कीच होईल. कारण त्यावेळी लोकशाहीचा गळा घोटला गेला होता. भारतीय राज्यघटनेच्या संस्थापकांची तपश्चर्या नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याला कुलूप लावण्यात आले होते.

नेहरूंपासून राजीव गांधी , राहुल गांधी यांच्यावर  निशाणा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेहरूजींनी जे सुरू केले, ते इंदिराजींनी पुढे नेले आणि राजीवजींनी ते मजबूत करत त्याला समर्थन देऊन त्याचे पालनपोषण केले. कारण संविधानाशी छेडछाड करण्याची ही सवय खूप खोलवर रुजली होती. आता पुढची पिढीही या छेडछाडीत अडकली. असे म्हणत त्यांनी नेहरु गांधी परिवारावर निशाणा साधला.

लोकशाहीचा घोर अवमान

निवडणूक प्रकरणात इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल देणारे न्यायमूर्ती एच.आर. खन्ना  हे रोषाचे लक्ष्य बनले. न्यायमूर्ती खन्ना हे ज्येष्ठतेच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होण्याच्या रांगेत होते आणि त्यांना  जाणूनबुजून सरन्यायाधीशपद देण्यात आले नाही. हा संविधान आणि लोकशाहीचा घोर अवमान होता.

देशाच्या एकात्मतेच्या मूळ भावनेवरच आघात

पंतप्रधान म्हणाले की , “मला अत्यंत दु:खाने सांगावे लागते की, संविधान तयार करणाऱ्यांच्या मनात एकात्मतेची भावना होती, मात्र स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेच्या मूळ भावनेवरच आघात झाला. आणि गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये वाढलेले लोक विविधतेतील एकतेऐवजी विरोधाभास शोधत राहिले.

हा संविधानाचा आदर

पंतप्रधान  मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, संविधान लागू होऊन ज्यावेळी 50 वर्षे झाली त्यावेळी योगायोगाने मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी संविधान सजवलेल्या हत्तीवर स्वार होते आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याच्या पायाखाली चालत होते. हा संविधानाचा आदर आहे. आणि आज संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असताना आपण संविधान दिन साजरा करत आहोत. देशवासीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात आम्ही व्यस्त आहोत.

आमच्या सरकारच्या निर्णयांमध्ये भारताची एकता मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. कलम 370 हा एकात्मतेला अडथळा होता आणि म्हणून आम्ही ते जमीनदोस्त केला आहे.

खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला; दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपद मिळणार?

Web Title: Prime minister narendra modi strongly criticizes congress over emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 08:01 PM

Topics:  

  • lok sabha
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Vote Adhikar Yatra: राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या यात्रेमुळे वाढली भाजपची धाकधुक; SIR मुळे राजकारण तापणार!
1

Vote Adhikar Yatra: राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या यात्रेमुळे वाढली भाजपची धाकधुक; SIR मुळे राजकारण तापणार!

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून
2

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा
3

“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा

Bihar News: देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले जात आहेत;  प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
4

Bihar News: देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले जात आहेत; प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.