
उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये (Ghazipur) एक मोठी दुर्घटना घडली आहे. लग्न समारंभ आटोपून परत येणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळानं घाला घातला आहे. हाय टेंशन वायर बसवर पडल्याने आग (Ghazipur Bus FIre ) लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. बसमध्ये 35 हून अधिक लोक प्रवास करत होते.
[read_also content=”उन्हाळ्यात ‘हा’ सोपा पदार्थ करेल शरिराची उष्णता कमी, फक्त या टिप्स ठेवा लक्षात! https://www.navarashtra.com/lifestyle/curd-rice-easy-recipe-for-summer-nrps-514588.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूर येथील मढ येथील कोपागंज येथून लग्नाची मिरवणूक घेऊन बस मर्दा येथील महाहर धाम येथे येत होती. यावेळी कच्च्या रस्त्यावरून जात असताना बसचा अपघात झाला. एचटी लाईनच्या संपर्कात आल्यानंतर बसला अपघात झाला. या आगीत सुमारे दहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझीपूर दुर्घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जळालेल्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले.