ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू होते. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशदवादी तळ उदध्वस्त केले. दरम्यान पाकिस्तानकडून भारतीय हवाई दलाची विमाने पाडल्याचा दावा केला जात असताना राहुल गांधी यांनीही भारताने किती विमानं गमावली? असा थेट सवाल त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केला आहे.
EAM Jaishankar’s silence isn’t just telling — it’s damning.
So I’ll ask again: How many Indian aircraft did we lose because Pakistan knew?
This wasn’t a lapse. It was a crime. And the nation deserves the truth. https://t.co/izn4LmBGJZ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 19, 2025
राहुल गांधी यांनी X वर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये, ‘जयशंकर यांचं मौन खूपच गंभीर बाब आहे. म्हणून मी पुन्हा एकदा विचारतो: ऑपरेशन सिंधूरमध्ये किती भारतीय विमानं पाकिस्तानला माहिती मिळाल्यामुळे गमावली?, याची माहिती सरकारने दिली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.
यावर भाजपच्या अमित मलविय यांनी राहुल गांधी यांच्या टिप्पणीला “विकृत” आणि “पाकिस्तानची भाषा” म्हटलं आहे. राहुल गांधींचा मूर्खपणा हा केवळ एक संयोग नाही, तो एक गंभीर मुद्दा आहे. ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, अशी टीका केली आहे.
Rahul Gandhi’s daftness is not merely incidental—it is sinister. He is speaking the language of Pakistan.
For the benefit of India, and to expose the intent of the Leader of the Opposition, I am reposting the statement of DGMO Lieutenant General Rajiv Ghai, dated 11.05.2025:… https://t.co/NBqHRPvdLR pic.twitter.com/UeJ5vj1vzV
— Amit Malviya (@amitmalviya) May 19, 2025
राहुल गांधींनी १७ मे रोजी जयशंकर यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये जयशंकर यांनी सांगितलं की, भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उदध्वस्त करण्यापूर्वी माहिती दिली होती. हल्ल्यापूर्वी माहिती देणं गुन्हा होता. परराष्ट्र मंत्र्यांनी हे सार्वजनिकपणे कबूल केलं आहे. यासाठी कशाला परवानगी दिली? ऑपरेशनमुळे आमच्या हवाई दलाला किती विमानं गमवावी लागली?” त्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने यावर खुलासा करताना राहुल गांधी यांचं विधान चुकीचं ठरवत ऑपरेशन सिंधूरच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानला खबर दिली गेली होती, पण हल्ल्यापूर्वी नसल्याचं सांगण्यात आलं होतं.