Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिका-चीनची नक्कल केल्याने विकास होणार नाही:सरसंघाचलक

ते म्हणाले, "मी आज एक संदेश देतो की, विश्वास व प्रेमात समानता आहे. कारण, या दोन्ही गोष्टी बळजबरीने साध्य करता येत नाहीत. काशी तमिळ संगमम् ने दोन्ही क्षेत्रांमध्ये विश्वास व प्रेमाचे एक नवे वातावरण तयार केले आहे. भागवत पुढे म्हणाले की, भारताला जगाकडून शिकण्याची गरज असेल तर देश अवश्य शिकेल. पण आपल्या मूळ सिद्धांत व विचारांवर कायम रहावे लागेल.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 19, 2022 | 09:59 PM
अमेरिका-चीनची नक्कल केल्याने विकास होणार नाही:सरसंघाचलक
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख अर्थात सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी भारताच्या विकास मॉडलवर भाष्य केले. ते म्हणाले की, भारताने चीन व अमेरिकेची नक्कल करू नये. त्याने स्वतःच्या मार्गावर चालावे. यासाठी भारताला स्वतःचे मॉडल स्वीकारण्याची गरज आहे. भागवत मुंबईत भारत विकास परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भारताला विश्वगुरु बनवण्याच्या दिशेने काम करण्याची गरजही व्यक्त केली.

सरसंघचालक म्हणाले – भारताचा दृष्टिकोन लोकांची परिस्थिती, संस्कार, संस्कृती, जगाच्या आधारावर विचार करण्याचा असला पाहिजे. जगात काही चांगले आले तर त्याचा स्वीकार करू. पण निसर्ग व आपल्या अटींवर त्याचा स्वीकार केला जाईल.

भागवत म्हणाले – भारत विविध भाषा, संस्कृती, व्याकरण, कला व सभ्यतांनी निर्माण झाला आहे. पण जवळून पाहिल्यास या देशाचा आत्मा एकच आहे. हा भारताचा अविभाज्य आत्मा आहे.

ते म्हणाले, “मी आज एक संदेश देतो की, विश्वास व प्रेमात समानता आहे. कारण, या दोन्ही गोष्टी बळजबरीने साध्य करता येत नाहीत. काशी तमिळ संगमम् ने दोन्ही क्षेत्रांमध्ये विश्वास व प्रेमाचे एक नवे वातावरण तयार केले आहे. भागवत पुढे म्हणाले की, भारताला जगाकडून शिकण्याची गरज असेल तर देश अवश्य शिकेल. पण आपल्या मूळ सिद्धांत व विचारांवर कायम रहावे लागेल.

मोहन भागवत यांनी यावेळी राष्ट्र प्रथमचा पुनरुच्चार करत भारत विविधतेत एकतेची भूमी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले – आपल्या राज्यघटनेने आपल्याला सामाजिक सुरक्षा दिली आहे. त्यामुळे देशाने जे काही दिले आहे ते आपल्याला फेडावे लागेल. भारत जग जिंकण्यासाठी नव्हे तर जनतेला एकजूट करण्यासाठी आहे. आपली वैशिष्ट्य व गुण जगात संतुलन राखतील.

मोहन भागवत म्हणाले की, भारत विकसित झाला तर जगही विकसित होईल. यामुळे जगात युद्ध होणार नाही. आपण बलशाही झालो तर चीन, अमेरिका व रशियासारख्या काठ्या चालणार नाहीत. आपल्यालामुळे काठ्या चालवणाऱ्यांच्याही काठ्या मोडीत निघतील. पण हे सर्व काही करायचे असेल तर सर्वांना मिळून काम करावे लागेल.

Web Title: Rss chief mohan bhagwat said india should develop own model

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2022 | 09:59 PM

Topics:  

  • BJP
  • mohan bhagwat
  • RSS
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
1

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

काँग्रेस नेत्याला संघाची प्रार्थना तोंडपाठ; सभागृहात ‘नमस्ते सदा वत्सले…’म्हणताच भाजप नेत्यांच्या आनंदाला उधाण
2

काँग्रेस नेत्याला संघाची प्रार्थना तोंडपाठ; सभागृहात ‘नमस्ते सदा वत्सले…’म्हणताच भाजप नेत्यांच्या आनंदाला उधाण

Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा
3

Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ
4

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.