जयपूर : कोटा हे शिक्षण शहर म्हणून जगभर ओळखले जाते. मात्र, काही मुलांच्या आत्महत्या प्रकरणांनी मन विषिण्ण होते. या आत्महत्येमागे केवळ अभ्यासाचा ताणच नाही तर इतरही अनेक कारणे आहेत. पण तरीही मुलाचा जीव जाणे अत्यंत चिंताजनक आहे. राजस्थानच्या आधीच्या सरकारनेही यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
2023 मध्ये 27 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे कोटा देशभरात चर्चेत राहिला. जिल्हाधिकारी स्तरावर अनेक बैठकांमध्ये आत्महत्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्या रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आले. कोचिंग संस्था, पालक, वसतिगृह-पीजी आणि प्रशासन यांच्या प्रभावी समन्वयातून आणि सामूहिक प्रयत्नातून ही समस्या सोडवली पाहिजे.
इतर राज्यांच्या तुलनेत कमी प्रमाण
देशाच्या अनेक भागांमध्ये, विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांची संख्या राजस्थानपेक्षा जास्त होती, परंतु तरीही कोटाला लक्ष्य करण्यात आले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये देशभरात 13 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 1834, मध्य प्रदेशात 1308, तामिळनाडूमध्ये 1246, कर्नाटकात 855 आणि ओरिसामध्ये 834 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. राजस्थानमध्ये हा आकडा 633 आहे जो इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.






