
गोरखपूर : पुर्नविवाहाच्या अनेक बातम्या आपण नेहमी वाचतो,बघतो. साथीदाराला गमावल्यानंतर अनेक जण एकटं राहण्यापेक्षा पुन्हा लग्न करतात असचं एक लग्न उत्तर प्रदेशमध्ये झालं आहे. पण हे लग्न सोशल मिडियावर (Social MEdia) सध्या चांगलच चर्चेचा विषय ठरलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका 70 वर्षीय सासऱ्याने आपल्या 28 वर्षीय सुनेसोबत मंदिरात (Uttar Pradesh Marriage News) लग्न केले आहे. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
[read_also content=”भीकेला लागलेल्या पाकिस्तान! एका डॉलरसाठी मोजावे लागत आहेत भारताच्या तुलनेत तिप्पट पैसे, श्रीलंकेसारखी स्थिती होणार का? https://www.navarashtra.com/world/due-to-economic-currency-pakistani-currency-going-down-as-compare-to-u-s-dollar-nrps-364834.html”]
आजतक दिलेल्या वृत्तानुसार, गोरखपूर जिल्ह्यातील छपिया उमराव गावातील रहिवासी कैलाश यादव (70 वर्षे) यांनी आपल्या सुनेशी (28 वर्षे) हिच्याशी मंदिरात लग्न केले. या लग्नामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कैलाश यादव बरहलगंज हे एका पोलिस स्टेशनमध्ये चौकीदार म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले. काही दिवसांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. सून विधवा झाली होती. कैलासच्या 4 मुलांपैकी तिसरी सून पतीच्या मृत्यूनंतर आपले जीवन इतरत्र सेटल करणार होती. पण इतक्यात सासरचे मन सुनेवर पडले. यानंतर वय आणि समाजाचे बंधन तोडून दोघांनी मंदिरात जाऊन एकमेकांसोबत सात फेरे घेतले.
दोघांच्याही वयात 42 वर्षाच अतंर आहे तरीही दोघांनी परस्पर संमतीने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहाबाबत पोलिस किंवा प्रशासन स्तरावर कोणत्याही पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी सुनेची दुसऱ्या ठिकाणी लग्न करुन दिलं होतं मात्र, काही दिवसात सुन तिच्या सासरी परत आली. परतल्यानंतर ती सासरऱ्यांनी तिच्या भविष्याचा विचार करून तिला पत्नी बनवण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या संमतीने मंदिरात जाऊन लग्न केले. अशीही चर्चा परिसरात सुरु आहे.