नवी दिल्ली : आयपीएलमध्ये (IPL 20230 धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडची (Rituraj Gaikwad) मेहनत अखेर फळाली आली आहे. कारण आता WTC Final साठी ऋतुराज हा भारतीय संघाबरोबर इंग्लंडला जाणार आहे. कारण बीसीसीआयने यापूर्वी संघ जाहीर केला होता. पण आता त्यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे आणि त्यामुळेच ऋतुराज हा भारतीय संघाबरोबर आता विश्व अजिंक्यपद फायनलसाठी इंग्लंडला जाणार आहे.
अजिंक्य रहाणेसह ऋतुराजलासुद्धा मिळाले स्थान
बीसीसीायने काही दिवसांपूर्वी फायनलसाठी आपला संघ जाहीर केला होता. त्यावेळी बीसीसीआयने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला भारतीय संघात स्थान दिले होते. त्यामुळे बीसीसीआयचे काही जणांनी कौतुकही केले होते. अजिंक्य हा जवळपास १५ महिन्यांनी आता भारतीय संघात परतला आहे. भारतीय संघ जाहीर केल्यावर बीसीसीआयने त्यानंतर एका मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ऋतुराजबरोबर अजून चार खेळाडू हे फायनलसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.
राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात
ऋतुराज गायकवाडबरोबर यावेळी सर्फराझ खान आणि इशान किशन यांचा राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुकेश कुमार आणि नवदीप सैनी हे दोन्ही वेगवान गोलंदाजही भारतीय संघात राखीव खेळाडू असतील. त्यामुळे हे पाचही जणं राखीव खेळाडू म्हणून आता इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
भारतीय संघ या फायनलमध्ये
जूनच्या पहिल्या आठवड्यात ही फानल रंगणार आहे. आयपीएल २८ मे पर्यंत चालेल, त्यानंतर भारतीय संघ WTC फायनलसाठी इंग्लंडला रवाना होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी ही लढत इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर ७ जूनपासून सुरू होईल. गेल्याच आठवड्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फायनलसाठीचा संघ जाहीर केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी झाली होती. ही मालिका भारताने २-१ने जिंकत WTCच्या फायनलमध्ये स्थान पक्के केले होते. सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ या फायनलमध्ये पोहोचला आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.