
photo- social media
CSK च्या ऐतिहासिक पर्वाचा शेवट! ७ किताब जिंकून देणाऱ्या दिग्गजाची 18 वर्षांनंतर टीममधून एक्झिट
एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत ११० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाने ६१ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले आहेत. दोन सामने ड्रॉ राहिले तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. हेड टू हेडची आकडेवारी पाहता भारतीय संघाचा दबदबा स्पष्ट दिसत आहे.
भारताने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण ४४ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यापैकी १८ जिंकले आहेत आणि २३ गमावले आहेत. एक सामना ड्रॉ राहिला तर दोन सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला. इंग्लंडच्या भूमीवर यजमान संघाचे पारडे जड असल्याचे दिसते. भारताची इंग्लंडमधील शेवटची मालिका २०२२ मध्ये झाली होती, जिथे रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली होती. त्यांनी ती मालिका २-१ ने जिंकली होती.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघः शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव