
फोटो सौजन्य AI
अमेरिकेने इराणच्या बंदर अब्बास आणि अहवाज प्रांत सहित खुर्रमाबादच्या प्रमुख मिसाईल ठिकाणावर जोराने हल्ले करायला सुरवात केली . तसेच या कारवाईमध्ये चाबहार बंदरावरच्या मुख्य कंट्रोल टॉवर , पूल , रेल्वे मार्ग आणि पॉवर सप्लाय स्टेशनवर हल्ले केले . यामध्ये प्रामुख्याने अश्या ठिकाणांवर हल्ले केले जिथून इराणच्या IRGC ने अमेरिकेच्या मध्य पूर्व सैन्य स्थळावर हल्ले केले गेले . या सगळ्या हल्ल्या आणि प्रतिहल्ल्यामध्ये अमेरिकेत एक चर्चा सुरु झाली कि जर इराण अश्या हल्ल्यानंतर शरण येत नसेल तर वेगळा मार्ग निवडावा लागेल . त्यासाठी आता फक्त इराणमध्ये सैन्य घुसवणे खासकरून सुरवातीला होर्मूझ आणि आसपासचे बंदर ताब्यात घेणे यासाठीच्या चर्चा अधिक जोमाने जोर पकडू लागल्या आहेत . असे मिळालेल्या माहितीवरून सांगता येते .
अमेरिकन सैन्याने केलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मूझ वरील हल्ल्यात होर्मूझ मध्ये असलेल्या लेसर तनब आणि मुख्य तनब बेटांना देखील लक्ष केले आहे . जाणकारांच्या मते या बेटावर केलेल्या हल्ल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार भविष्यात राजकीय कूटनीती आणि करार करण्याच्या बाबतीत याच्यावर इराण सोबत व्यवहार करायला वापर करेल . या हवाई हल्ल्यात नागरिकांचा संपर्क तोडण्याचा आणि जमिनीवरील हल्ल्याची तयारी करण्याचा अमेरिकेचा मनसुबा असल्याचं मिळालेल्या माहिती वरून बोलले जात आहे . जाणकारांच्या मते पेंटागॉन मधील अमेरीकेचे सैन्य स्थळाचे केंद्रबिंदू , इराणचा तटीय आयात निर्यात मार्ग बंद करून त्यांच्या सैन्याचे कमांड नेटवर्क उध्वस्त करण्याचा अमेरिकेचा मानस आहे . परंतु व्हाईट हाऊसच्या या आक्रमक मोहिमेला प्रचंड जोखीम आहे असे मानले जात आहे . कुठल्याच सुरक्षा कवचाशिवाय इराणच्या या दोन बेटांवर सैन्य उतरवणे म्हणजे इराणच्या तोफेसमोर सैन्य ठेवणे हा प्रकार आहे . हि दोन बेटे इराणच्या तेहरान पासून अगदीच जवळ आहेत त्यामुळे इराणला तेहरान मधून इथे हल्ला करण्यासाठी मोठ्या मिसाईलची सुद्धा गरज नाहीये . त्यांच्या छोट्या मिसाईल मध्ये हि ते अमेरिकन सैन्याचा आरामात बाजार उठवू शकतात . आणि अमेरिकेचे सैन्य एका चक्रव्यूहात अडकून पडेल . हि खूपच दाट शक्यता आहे .
IRGC चे सैनिक फक्त वाटच बघत आहेत कि कधी अमेरिकन सैन्य या बेटांवर येतंय , इराणी कमांडर आपल्या भूमीवर अमेरिकन सैन्यासाठी व्यवस्थित योजना आखून बसलेले आहे . कारण त्यांनी बरीच वर्ष झाली हा विचार करूनच ठेवला आहे कि कधी ना कधी अमेरिका सैन्य आपल्या भूमीवर पाठवेल . आणि जर पेंटागॉनला वाटत असेल कि आपण सुरवातीला तनब सारखी बेटे घेऊन या युद्धात विजय किंवा आघाडी घेऊ शकतो तर ते साफ चुकीचं ठरणारं पडेल . इराणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे हा संघर्ष खूप घातक आणि विनाशकारी ठरणार आहे . इराणकडे विशेष असे आता काही राहिले नाही , त्यामुळे इराण आता अमेरिकेला जश्यास तसे उत्तर देण्यात मागे पुढे पाहत नाही . दुसरी महत्वाची गोष्ट या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेने वॉर क्रायम करत आयतुल्ला खामेने यांचा खून केल्यानंतर विभागलेला इराण आता पूर्णपणे एकवटला असून देशातील सारी जनता IRGC आणि सरकार मागे ठाम उभी राहिली . त्यामुळे जमिनीवर उतरल्यावर अमेरिकेला फक्त इराणी सैनिकांसोबतच नाही तर इराणच्या जनतेशी सुद्धा लढावं लागणार आहे .