Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी आंदोलनामुळे वाढली योगी सरकारची डोकेदुखी; भाजपला याची किंमत भविष्यात मोजावीच लागणार

इ.स. २०१७ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला जे प्रचंड यश मिळाले होते, त्यामध्ये मेरठ, 'बागपत आणि पश्चिम उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांचे मोठे योगदान होते. त्यावेळी या विभागातील शेतकरी भाजपाच्या पाठीशी उभे होते. परंतु आता मात्र परिस्थिती बदललेली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 18, 2021 | 11:21 AM
शेतकरी आंदोलनामुळे वाढली योगी सरकारची डोकेदुखी; भाजपला याची किंमत भविष्यात मोजावीच लागणार
Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार समोरा- समोर उभे ठाकले आहेत. कोरोना महामारीच्या संकटातसुद्धा शेतकर्‍यांचे हे आंदोळन गेल्या ६ महिन्यांपासून सुरू आहे. भाजप नेते आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतलेली आहे.

या आंदोलनामुळे शेतकरी आणि भाजपमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात. या निवडणुकांमध्ये भाजपाला मोठा झटका बसला. भाजपाचा पराभव झाला तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला येथे विजय मिळाला. पुढील वर्षी उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाही. तर उप्र. विधानसभा निवडणुकीतही भाजपाला पराभूत करू, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे.

हे आंदोलन अडत्यांचे आहे, या आंदोलनात शेतकरी नाहीत, शेतकरी त्यांच्या शेतात राबत आहेत असा प्रचार भाजपा करत आहे. तरीही हे आंदोलन सुरूच आहे. केंद्र सरकारने ३ कायद्यांपैकी १ कायदा मागे घेण्याची तयारी दर्शविली, परंतु शेतकरी मात्र तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून ते सर्व कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर ठाम आहेत. २२ जानेवारीनंतर चर्चेसाठी सरकारकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

जोपर्यंत सरकार आमच्यासोबत चर्चा करणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका टिकेत यांनी घेतलेली आहे. उत्तरप्रदेश कृषिप्रधान राज्य आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी आणि भाजपाचे समर्थन करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केले नाही, तर भाजपाची अत्यंत वाईट अवस्था होईल. या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या संयुक्‍त आघाडीचेही शेतकरी समर्थन करू शकतात. यामुळे शेतकरी आंदोलन ही उप्रच्या योगी सरकारची मोठी डोकेदुखी झालेली आहे.

Web Title: Headaches of the yogi government increased due to the peasant agitation the bjp will have to pay the price in the future nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2021 | 11:21 AM

Topics:  

  • BJP
  • headaches

संबंधित बातम्या

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
1

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
2

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’
3

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल
4

मिरा-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाआधी श्रेयवादाची लढाई तीव्र; Metro Man कोण? बॅनरबाजीवर मनसेचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.