
Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; 'या' जिल्ह्यांना झोडपणार
विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
नुकसानीचे पंचनामे करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
Maharashtra Weather Update: राज्यात नुकतीच थंडी संपून उन्हाळा सुरू होईल असे दिसत असतानाच अवकाळी पावसाने राज्यातील विविध भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे. अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना देखील बसताना दिसून येत आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेले काही दिवस राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाल्याचे समोर आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पिकांचे देखील नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. काल पावसाने कोकण, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी देखील हजेरी लावली आहे.
Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न
राज्यावर भयानक संकट
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. बीड, यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा, वडवणी परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे समोर आले आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अवकालीचा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका देखील बसला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा पिकला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आंबा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…
हवामानातील बदल आणि अवकाळी पावसाचा काजू आणि आंबा फळावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाडा, विदर्भात देखील ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.