• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Mahabharata Modern World Positive Thought Human Life Is Precious Mahabharata War

जसा संग तसा रंग

आजकाल मोबाईलची सोबत (कंपनी) अधिक आवडीची झाली आहे. जगात सत्संगाला मोठे महत्त्व आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 24, 2023 | 06:00 AM
जसा संग तसा रंग
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब शिंपल्यामध्ये पडल्यास ते मोती बनतात, जर ते थेंब पानावर पडले तर दव आणि सापाच्या तोंडात पडले तर त्याचे विष बनते. थेंब पावसाचे आहेत; परंतु जशी सोबत मिळाली तसे रूप बनले. जर एखाद्या परिस दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला तर ते सोने होते आणि जर लोखंडाला पाणी लागले तर गंज पकडतो. आपलं सुद्धा तसेच नाही का? जशी संगत धरू तसे जीवन बनत जाईल. पण मनुष्य जीवन मौल्यवान आहे. त्याचे मूल्य आपण जाणून घ्यावे.

आधुनिक जगामध्ये विज्ञानाने आपल्याला बरीच संसाधने उपलब्ध करून दिली आहेत, ज्यामुळे जगातल्या काना-कोपऱ्यातल्या बर्‍याच बातम्या आपल्याला मिळतात. ऐकण्याची आणि पाहण्याची आवड असल्यामुळे आज प्रत्येक जण मोबाईल पाहण्यात मग्न आहे. हे एक साधन आहे, त्यात चांगल्या आणि वाईट सर्व गोष्टी मिळतात. काहीजण याचा वापर ज्ञानाचा साठा वाढवण्यासाठी करतात आणि काही वाईट गोष्टी. आपण कोणत्या गोष्टी आपल्याजवळ साठवत आहेत ते नीट पहावे. आजचा तरुण वर्ग चुकीच्या गोष्टी पाहून, आपली मानसिकता कमकुवत करुन आपले मन रोगी बनवत आहे. म्हणून कोणत्या गोष्टींचा संग करावा ह्याची थोडीशी सावधगिरी बाळगावी.

महाभारतात असे दर्शविले गेले आहे की कर्ण आणि अर्जुन एकाच आईचे (कुंतीचे) पुत्र, दोघेही अव्वल दर्जाचे धनुर्धर. अर्जुनापेक्षा कर्ण अधिक सामर्थ्यवान; पण दोघांची संगत निराळी. अर्जुनाला श्रीकृष्णाची साथ लाभल्यामुळे महाभारताच्या युद्धामध्ये विजय मिळाला. आणि कर्णाची मैत्री दुर्योधनाशी झाली. खरं तर कर्णामध्ये बरीच वैशिष्ट्ये होती, पण दुर्योधनाबरोबर राहून काही वाईट गोष्टीही त्यांनी स्वीकारल्या. दुर्योधनाच्या उपकारामुळे कर्णाला असत्याचा मार्ग निवडावा लागला. तेच दुसऱ्या ठिकाणी अर्जुनाला पाहिले तर त्याची स्वामी भक्ति व निर्मळ मनामुळे भयंकर युद्धातही विजय मिळविला. कर्णाचा दुसरा अर्थ कान आहे. बर्‍याच वेळा आपण फक्त ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. ज्यामुळे खूप गैरसमज ही होतात; परंतु अर्जुनाने केवळ ऐकण्यावरच नाही तर पाहण्यावर विश्वास ठेवला. श्रीकृष्णाने एक महान रूप दाखवल्यावर अर्जुनाची श्रद्धा आणखी वाढली. त्यानंतर त्यांनी श्रीकृष्णाच्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवला. आपण सुद्धा पाहणे आणि ऐकणे यावर विश्वास ठेवावा. चांगल्या गोष्टी ऐकून मनाला त्यावर स्थिर करावे. ज्यामुळे आपल्या कल्पना शक्तिचा विकास तीव्र गतीने होईल.

आपल्याला कर्म आणि विचारांनी श्रेष्ठ व्हायचे आहे आणि दुसऱ्याना बनवायचे ही आहे. जसे कचरा रस्त्यावर पडला असेल तर आपण त्याला पाहत बसत नाहीत, त्याचप्रमाणे आपल्या जीवनात काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर आपण त्यातून आवश्यक बाबी लक्षात ठेऊन बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जावे. ‘कमींशी माझे काही काम नाही’. या वाक्यावर दृढ रहावे. या मार्गावर अनेक अडथळे येतील पण मला त्यामुळे कुठेही थांबायचे नाही आणि मागे वळून बघायचे नाही, फक्त पुढे आणि पुढे जायचे आहे.

आपल्या मनामध्येही आपण बरीच दृश्ये, प्रसंग साठवून ठेवली आहेत पण काय लक्षात ठेवावे किंवा काय विसरून जावे याचे ज्ञान जरूर असावे. कारण माणूस आपल्या आतील जगात जास्त जगतो. म्हणून आपले जग उत्कृष्ट बनवा. सुगंधित फुले ज्याप्रमाणे मनाला आकर्षित करतात, आनंद देतात, त्याच प्रकारे चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचा आनंद मिळवावा. आनंदात राहणे किंवा दुःखात जीवन जगणे ही आपली निवड आहे. पांढर्‍या कपड्याला पाण्याच्या कोणत्याही रंगात बुडवले तर त्यावर त्याच प्रकारचा रंग चढतो. आपल्याला कोणता रंग लावून घ्यायचा आहे ते आपणच ठरवावे. कारण ‘जशी संगत तशी रंगत’.

तसेच अनेक प्रकारची सोबत आपण निवडू शकतो. काही स्वतःला चांगल्या पुस्तकांशी जोडतात, काही गुरूबरोबर, तर काही व्यसनाना सोबती बनवतात. आजकाल मोबाईलची सोबत (कंपनी) अधिक आवडीची झाली आहे. जगात सत्संगाला मोठे महत्त्व आहे. काही लोक गीता, भागवत, रामायण कथा ऐकण्यासाठी त्यांचा वेळ देतात, खरंतर हाच वेळ कुठेही घालवता आला असता; परंतु चांगल्या कंपनीत जाण्यात आणि चांगल्या गोष्टी ऐकण्यात त्यांची रुचि असते. चांगुलपणा माणसाला चांगल्या वाटेकडे नेतो आणि चुकीची आवड चुकीच्या मार्गावर ‘सत का संग तारे कुसंग डुबोए’ अशी एक म्हण आहे.
जेव्हा आपले मन परमात्म्याच्या आठवणीने भारावून जाते, तेव्हा आपण शांतीचा आणि शक्तीचा अनुभव करतो तसेच या जगापासून अलिप्त होतो. अगदी गर्दीत, अगदी आवाजातही अलौकिक आनंद मिळतो. ईश्वराच्या शक्तींचा स्पर्श जेव्हा बुद्धीला होतो तेव्हा ती दिव्य व तीक्ष्ण होते. अशी बुद्धी वेळेवर अचूक निर्णय घेण्याचे सामर्थ्य ठेवते. ईश्वराचे सान्निध्य मनुष्याला दिव्यगुणानी भरपूर करते. म्हणून ज्याने आपले जीवन श्रेष्ठ व उज्ज्वल बनेल अशी साथ निवडावी व जीवनाचा मार्ग सरळ बनवावा.

– नीता बेन

Web Title: Mahabharata modern world positive thought human life is precious mahabharata war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • Mahabharata war
  • Shri Krishna

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

Nov 17, 2025 | 06:33 PM
एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

Nov 17, 2025 | 06:28 PM
भारतात ‘या’ कारचे फेसलिफ्ट व्हर्जन धडाधड लाँच होण्याच्या तयारीत, नवीन फीचर्सने असणार सुसज्ज

भारतात ‘या’ कारचे फेसलिफ्ट व्हर्जन धडाधड लाँच होण्याच्या तयारीत, नवीन फीचर्सने असणार सुसज्ज

Nov 17, 2025 | 06:07 PM
Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

Nov 17, 2025 | 06:04 PM
फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच रचला इतिहास! वाचा सविस्तर…

फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच रचला इतिहास! वाचा सविस्तर…

Nov 17, 2025 | 06:03 PM
“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Nov 17, 2025 | 06:02 PM
Sheikh Hasina Verdict : शेख हसीनाला 60 दिवसांत फाशी? आता फक्त ‘हा’ एक कायदाच वाचवू शकतो प्राण; वाचा सविस्तर

Sheikh Hasina Verdict : शेख हसीनाला 60 दिवसांत फाशी? आता फक्त ‘हा’ एक कायदाच वाचवू शकतो प्राण; वाचा सविस्तर

Nov 17, 2025 | 06:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.