Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण; सरकारला नवा अल्टीमेटम

मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणावर बसणार आहेत. अंतरवाली येथून त्यांनी आपल्या उपोषणाची घोषणा केली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी उपोषणावर बसले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 29, 2024 | 03:42 PM
मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आमरण उपोषण

मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आमरण उपोषण

Follow Us
Close
Follow Us:

जालना – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषणाचा हत्यार उगारले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून आपल्या उपोषणाची घोषणा केली. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावी अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. ते आपल्या मागणीवर ठाम आहे. आरक्षणासाठी त्यांनी सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी  येत्या 29 सप्टेंबरला आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. 29 सप्टेंबर हा नवा अल्टीमेटम त्यांनी सरकारला जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. तसेच आरक्षण दिले नाही तर निवडणूक लढवणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबोसीमधून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. यावरुन आता त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्धार केला आहे. अंतरवली सराटी येथून त्यांनी आपले उपोषण जाहीर केले. यावेळी अंतरवलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज जमा झाला होता. मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्या  आमरण उपोषणाला नकार देत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या निर्णायवर ठाम आहेत. येत्या 29 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणावर बसणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला 29 सप्टेंबरपूर्वी निर्णय घ्यावा लागणार आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा करताच मराठा समाजाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, “29 सप्टेंबरपर्यंत सरकार काय निर्णय घेतयं ते बघू, यांना आता आपण बघू, यांना निवडणूकीमध्ये पण पाडू.त्यांचे 113 आमदार आपण निवडून आणू देत नाहीत. पाडू म्हणजे पाडूच. त्याची काळजी तुम्ही करु नका. आरक्षणासाठी एक कुटुंब गेलं तरी चालतं. आपल्या जातीचं कल्याण होईल. लाखो कुटुंब वाचतील. ही आरपारची लढाई लढायची. 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण होणार म्हणजे होणारच, मागे हटायचं नाही. मी महिनाभर महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. सगळ्या तालुक्यांमध्ये मी जाणार आहे. 29 सप्टेंबरला सगळा महाराष्ट्र एक होईल. देवेंद्र फडणवीस याची जिरवायची म्हणजे जिरावयचीच. काय व्हायचं ते होऊ दे,” असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

फडणवीसाला माया आहे का नाही?

पुढे जरांगे पाटील म्हणाले, “हे रस्त्यावरच्या लढाईला घाबरत नाहीत. आता सगळा महाराष्ट्र बसवणार. 29 सप्टेंबर पर्यंत देवेंद्र फडणवीसकडे वेळ आहे. बघू यांना मराठा समाजासाठी माया आहे का नाही? नाही तर 29 सप्टेंबरपासून आपण आरपार लढाई करु. तेव्हा आपण ठरवू काय करायचं ते. मी समाजाला शब्द दिला होता की मी हटणार आहे. मागच्या एक वर्षापासून मी हटलेलो नाही. माझ्या समाजाचं एक वर्ष झालं नुकसान होतयं. माझ्या समाजाची बलिदानं गेली. मराठा आरक्षणासाठी बहिणींचं कुंकू पुसलेलं आहे. कोटीने मराठा समाज रस्त्यावर आहे. मला हे सहन होत नाही. त्याच्यामुळे हे 29 सप्टेंबरचं आमरण उपोषण आरपार होणार आहे,” अशा कडक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

Web Title: Maratha reservation manoj jarange patil will again on hunger strick for maratha reservation nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • Maratha Arakshan
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा
4

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.