Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

हातकणंगले तालुक्यातून २५ हजाराहून अधिक मराठा बांधव २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामुळे आता सरकारची चिंता वाढली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2025 | 04:59 PM
सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

Follow Us
Follow Us:

इचलकरंजी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी येत्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होणारच, कोणीही आडवं आलं तरी थांबणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळेल, अशीही चर्चा सुरु आहे. या लढाईत सहभागी होण्यासाठी हातकणंगले तालुक्यातून २५ हजाराहून अधिक मराठा बांधव २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामुळे आता सरकारची चिंता वाढली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वेळकाढुपणा केला आहे. मागच्यावेळी मुंबईकडे जाणारे मराठ्यांचे वादळ रोखून सरकारने फसवा आदेश देऊन फसवणुक केली. त्यामुळे २९ ऑगस्टची ही लढाई अंतिम असेल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनासाठी मुंबईकडे तालुक्यातील प्रत्येक मराठा समाजाच्या घरातील एक व्यक्ती सहभागी होईल, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक गावात बैठका, सोशल मिडीयाचा प्रभावी वापर आणि प्रसारमाध्यमांद्वारे मराठा बांधवांना आवाहन करण्यात येत असल्याचे पत्रकार बैठकीत सांगण्यात आले.

भविष्यात आपल्या पिढीसाठी या आंदोलनात मराठा बांधवांनी सहभागी व्हावे असे यावेळी सांगितले. यावेळी शिवाजी पाटील, कृष्णात बाणदार, मिलींद पाटील, संतोेष सावंत, शहाजी भोसले, प्रथमेश माने, शाम यादव, शरद पाटील, रमेश घोरपडे, अभिजीत घोरपडे, प्रशांत निकम, दिपक पाटील, सुभाष चव्हाण, राजेंद्र वाडकर, सागर चव्हाण, सुशांत पोळ, सुनिल दळवे, संदीप पाटील यांच्यासह सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा

अंतरवाली सराटीत झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. एकदा आमचे डोके फुटले, अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. आंतरवलीतील आया बहिणी दुःख सहन करावं लागलं, गुढघ्याचे ऑपरेशन झाले, मांड्यांला टाके घेतलेत. त्यामुळे फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची, आणि त्या भानगडीत पडायचं नाही. असंही जरांगेंनी म्हटले आहे.

Web Title: Maratha brothers from hatkanangle taluka will go to mumbai in support of manoj jarange patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Maratha Reservation
  • Maratha Samaj

संबंधित बातम्या

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार
1

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार
2

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप
3

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल
4

मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज करण्यापर्यंत पोलीसांची मजल, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र…; सपकाळांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.