Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहे. त्यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 14, 2025 | 08:45 PM
'कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी...'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

'कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी...'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

१. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक
२. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी
३. २९ ऑगस्टला मुंबईत धडक देणार

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहे. त्यांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऐन गणपतीच्या कालावधीत मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. कोणीही आडवे आले तरी, आम्ही २९ ऑगस्टला मुंबईला जाणारच असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. २९ ऑगस्ट रोजी त्यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे. मोठ्या ताकदीने मराठा समाज मुंबईत धडकणार आहे. त्यासाठी जरांगे पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईत आम्हाला आरक्षण दिले तर गुलाल लावून परतणार असेंजरांगे पाटील म्हणाले. आरक्षण दिले नाही तर मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

माझा जीव गेला तरी मी मुंबईत जाणारच. आझाद मैदानात बसून आरक्षणासाठी लढा देणार. यावेळी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सत्ता असेल तर काहीही करता येते असे वाटत असेल तर मुख्यमंत्र्यानी या गैरसमजातून बाहेर यावे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार

मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र मुंबईला धडकणार असून आरक्षणाचा निर्णय लागल्याशिवाय आता थांबणार नाही. एक घर, एक गाडी मुंबईला दाखल होणार असून आता मराठा समाज थांबणार नाही. आमची ताकद पूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. पुन्हा एकदा ताकद दाखवण्यासाठी मुंबईत या, असे आवाहन मराठा आंदाेलक मनोज जारंगे पाटील यांनी केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. २९ तारखेला मराठा समाज मुबईत जाणार असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; शिरोळमधून सरकारला दिला इशारा

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने आम्ही सधन आहोत, असे न समजता आरक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. ५८ लाख मराठा समाज कुणबी सापडला आहे. अजून तीन कोटी मराठा समाजाला कुणबी दाखले मिळतील. याचा फायदा नक्कीच समाजाला होणार आहे. शिरोळकरांच्या दाखल्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईत दाखल होणार आहे. आंदोलन यशस्वी होईपर्यंत माघार नाही. या आंदोलनामुळे समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीला आता कोणीही अडवू शकणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Manoj jarange patil warn to maharashtra government devendra fadnavis maratha reservation mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
1

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

“त्यांची पत काय आहे, हे सूज्ञ पुणेकरांना…”; Pune Jain House Land प्रकरणात चंद्रकांत पाटलांची टीका
2

“त्यांची पत काय आहे, हे सूज्ञ पुणेकरांना…”; Pune Jain House Land प्रकरणात चंद्रकांत पाटलांची टीका

महसूलमंत्री बावनकुळे यांचा जागा हडप करणाऱ्या लॉबीला दणका; नूतनीकरणाचा ‘तो’ प्रस्ताव नामंजूर
3

महसूलमंत्री बावनकुळे यांचा जागा हडप करणाऱ्या लॉबीला दणका; नूतनीकरणाचा ‘तो’ प्रस्ताव नामंजूर

Bachchu Kadu Nagpur: बच्चू कडू अन् जरांगे पाटील यांची अनोखी युती? आंदोलनातून महायुती सरकारला आणले नाकी नऊ
4

Bachchu Kadu Nagpur: बच्चू कडू अन् जरांगे पाटील यांची अनोखी युती? आंदोलनातून महायुती सरकारला आणले नाकी नऊ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.