Team India's 9 Players Car Accident : टीम इंडियाच्या ९ खेळाडूंचा झालाय कार अपघात; मृत्यूला मात देत त्यांनी पुन्हा केलयं पुनरागमन
Team India’s 9 Players Car Accident : टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुली गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी कार अपघाताचा बळी ठरला. वर्धमानला जात असताना, त्यांच्या रेंज रोव्हर कारला एका लॉरीने धडक दिली. यानंतर, सौरव गांगुलीच्या गाडीच्या चालकाने गाडी नियंत्रित करण्यासाठी ब्रेक लावला तेव्हा अचानक ताफ्यातील सर्व वाहने एकामागून एक त्यांच्या गाडीवर आदळली. या भीषण अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले. मात्र, तो थोडक्यात बचावला. त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. असे जीवघेणे अपघात यापूर्वी अनेक भारतीय क्रिकेटपटूंसोबत घडले आहेत. अपघातानंतर मृत्यूला हरवणाऱ्या या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
राहुल द्रविड
कालच सौरव गांगुलीच्या अपघाताअगोदर याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या कारला एका लोडिंग ऑटोने मागून धडक दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला होता. धडकेनंतर त्याच्या गाडीला मोठा खड्डा पडला. तथापि, समाधानाची गोष्ट अशी होती की, यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. पण टक्कर झाल्यानंतर राहुल द्रविड आणि ऑटो चालक यांच्यात जोरदार वाद झाला.
ऋषभ पंत
भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा भीषण अपघात तर सर्व खेळाडूंच्या डोळ्यात अंजन घालणारा होता. सन २०२२ मध्ये, दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकली. यानंतर त्याच्या गाडीला आग लागली. या जीवघेण्या अपघातातून पंतला वाचणे कठीण वाटत होते. पण त्याने त्याचे नशीब बलवत्तर आणि स्वतः त्याचे कमालीच्या धाडसाने त्याने मृत्यूला मात देत आपली कारकीर्द पुन्हा उजळवली. या भयानक अपघातात त्याची क्रिकेट कारकीर्द संपली असेच मानले जात होते. पण पंत जवळजवळ दोन वर्षांनी चमत्कारिकरित्या क्रिकेटच्या मैदानावर परतला.
मोहम्मद शमी
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध खळबळ उडवून देणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील कार अपघाताचा बळी ठरला आहे. ७ वर्षांपूर्वी २५ मार्च २०१८ रोजी ते डेहराडूनहून नवी दिल्लीला परतत होते. त्यानंतर पहाटे ५ वाजताच्या सुमारास एका ट्रकने शमीच्या टोयोटा कारला धडक दिली. या अपघातात शमीला काही दुखापत झाली आणि त्याच्या डोक्याला १० टाके घालावे लागले.
प्रवीण कुमार
२०२३ मध्ये मेरठमध्ये झालेल्या एका मोठ्या कार अपघातातून माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार थोडक्यात बचावले. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, तो देखील आपल्या मुलासह पांडवनगर परिसरातून परतत होता. त्यानंतर त्यांच्या लँड रोव्हर डिफेंडर कारला एका भरधाव ट्रकने धडक दिली. प्रचंड टक्कर होऊनही, प्रवीण कुमार आणि त्यांच्या मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, जी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती. मात्र, या अपघातात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले.
जोगिंदर शर्मा
२००७ च्या टी-२० विश्वचषकाचा हिरो आणि वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मानेही कार अपघातात मृत्यूला हरवले आहे. २०११ मध्ये, नवी दिल्लीतील द्वारका येथे त्यांची कार एका बीपीओ वाहनाला धडकली. यानंतर त्याला ICU मध्ये दाखल करावे लागले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. फ्रॅक्चरसोबतच रक्ताच्या गुठळ्याही तयार झाल्या होत्या. जोगिंदर शर्मा यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यांना सुमारे ४०-४५ टाके घालावे लागले.
सुनील गावस्कर
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर २०१४ मध्ये एका अपघातातून थोडक्यात बचावले. खरंतर, भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर तो मँचेस्टरहून लंडनला जात होता. यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. दरम्यान, एका कारची त्याच्या जॅग्वारशी टक्कर झाली. पण या अपघातात तो थोडक्यात बचावला.
मोहम्मद अझरुद्दीन
भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन देखील रस्ते अपघाताचा बळी ठरला आहे. खरंतर, २०२० मध्ये तो त्याच्या कुटुंबासह रणथंभोरला जाणार होता. त्यानंतर सुरवाल येथील कोटा मेगा हायवेवर त्याचा कार अपघात झाला. या अपघातात अझरुद्दीनला किरकोळ दुखापत झाली आणि तो सुखरूप बचावला.
मन्सूर अली खान पतौडी
१९६१ मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांचाही अपघात झाला होता. ईस्ट ससेक्समधील होव्ह येथे त्यांची कार दुसऱ्या वाहनाशी धडकली. या अपघातात त्याने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी आपला उजवा डोळा कायमचा गमावला. त्यावेळी त्याने भारतासाठी पदार्पणही केले नव्हते. पण अपघातानंतर ६ महिन्यांनी पतौडी पुन्हा मैदानात परतले. तो केवळ टीम इंडियासाठी खेळला नाही तर वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात तरुण कसोटी कर्णधारही बनला.