Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या भाजपाला शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा अधिकार नाही – अतुल लोंढे

तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत असताना हे आंदोलन चिरडून टाकण्याचे पाप मोदी सरकारने केले. त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. या आंदोलनात ७०० च्या वर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला पण दिल्लीपासून अवघ्या काही मिनिटावर असलेल्या शेतकरी आंदोलनस्थळी जाण्यास पंतप्रधान मोदींना वेळ नाही.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 31, 2021 | 03:20 PM
शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या भाजपाला शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा अधिकार नाही – अतुल लोंढे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शेतकऱ्यांना कमी मदत दिल्याचा आरोप करत भाजपा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात १ नोव्हेंबरला आंदोलन करत आहे परंतु भाजपाचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा हा बनावट व पोकळ आहे. निसर्ग चक्रीवादळाचा कोकण व गुजरातला फटका बसला असता पंतप्रधान मोदी यांनी फक्त गुजरातची हवाई पहाणी करून तात्काळ एक हजार कोटींची मदत दिली पण महाराष्ट्राकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर भाजपाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी दुजाभाव करणाऱ्या मोदींविरोधात बोंबा माराव्यात, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

नैसर्गिक संकटात केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करताना नेहमीच सापत्न भावाची वागणूक दिली. जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळावेळी राज्याने केंद्राकडे १०६५.५८ कोटी रुपयांची मदत मागितली असता केवळ २६८.५९ कोटी रुपये दिले. पूर्व विदर्भात ऑगस्ट २०२० मध्ये आलेल्या पूरस्थितीवेळी ९९९.६४ कोटी रुपये मागितले असता केवळ १५१.५३ कोटी रुपये राज्याला दिले, जून-ऑगस्ट-२०२० च्या अतिवृष्टी व पूराच्या नुकसान भरपाईसाठी ३७२१.२९ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असता अद्याप एक दमडीही दिली नाही. तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी २०३.३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला परंतु अद्याप एक छदामही दिला नाही. केंद्रातील मोदी सरकारने राज्याला मदत दिली नाही त्याचा जाब मोदींना विचारण्याची हिम्मत राज्यातील भाजपा नेत्यांमध्ये नाही आणि उलट शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत असताना हे आंदोलन चिरडून टाकण्याचे पाप मोदी सरकारने केले. त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. या आंदोलनात ७०० च्या वर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला पण दिल्लीपासून अवघ्या काही मिनिटावर असलेल्या शेतकरी आंदोलनस्थळी जाण्यास पंतप्रधान मोदींना वेळ नाही. लखीमपूर खिरी यथे गरिब निष्पाप शेतकऱ्यांना भाजपाच्या मंत्रीपुत्राने गाडीखाली चिरडून मारले. अशा भारतीय जनता पक्षाला शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा काही अधिकार नाही. भाजपाचे हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे हे राज्यातील शेतकरी जाणतो, असेही लोंढे म्हणाले.

Web Title: The bjp which is crushing the farmers has no right to talk about the farmers atul londhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2021 | 03:20 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • Atul Londhe Congress
  • Congress

संबंधित बातम्या

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
1

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
2

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
3

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
4

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.