मुंबई : अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव (Ganeshotsav) आला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरु झाली आहे. अशात गणेशभक्तांसाठी आंनदाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( (Eknath Shinde) यांनी गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी (Toll waiver) जाहीर केली आहे. 26 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.
[read_also content=”अवघ्या 12 सेकंदात जमीनदोस्त होणार नोएडातील 32 मजली ट्विन टॉवर्स https://www.navarashtra.com/india/32-storey-twin-towers-in-noida-will-be-grounded-in-just-12-seconds-nrps-319771.html”]
बाप्पांच्या आगमणासाठी सर्वच जन उत्सुक आहेत. चाकरमानी आता कोकणाकडे निघत आहेत. टोलमाफीच्या निर्णयामुळे यावेळी गणपतीला घरी जाणाऱ्यांच्या खिशावरचा ताण जरा कमी झाला आहे.र मुंबई-बंगळुरु आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर टोल माफ करण्यात आला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यावेळी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गणेश भक्तांना टोल सवलत देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पासची आवश्यकता आहे.
[read_also content=”मुनव्वर फारुकीचा शो रद्द; विश्व हिंदू परिषदेची धमकी https://www.navarashtra.com/india/munawwar-farooquis-show-cancelled-threat-of-vishwa-hindu-parishad-nrgm-319749.html”]