Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज इंग्लंडशी सामना होणार आहे. ४९ सामन्यांत हा संघ ३७ वेळा पराभूत झाला आहे.

टीम इंडियाने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडिया ज्या पद्धतीने वर्ल्डकपमध्ये खेळत आहे, ते पाहता टीम इंडियाला पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकणं अवघड नाही. हा सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम एटिंगा येथे खेळवला जाईल.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 05, 2022 | 08:59 AM
अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज इंग्लंडशी सामना होणार आहे. ४९ सामन्यांत हा संघ ३७ वेळा पराभूत झाला आहे.
Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडिया ज्या पद्धतीने वर्ल्डकपमध्ये खेळत आहे, ते पाहता टीम इंडियाला पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकणं अवघड नाही.

दुसरीकडे, इंग्लंडही उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून दोन्ही संघांमधील हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. इंग्लंड १९९८चा चॅम्पियन आहे. हा सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम एटिंगा येथे खेळवला जाईल.

आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात १९ वर्षांखालील स्तरावर ४९ सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने ३७ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघाने ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये बरोबरी झाली. अंडर-१९ वर्ल्डकपबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि इंग्लंड ८ सामने आमनेसामने आले आहेत. भारतीय संघाने ६ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडने २ सामने जिंकले आहेत.

कोरोनाशी मात करून भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली
टीम इंडियाचा कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार शेख रशीद यांना विश्वचषकादरम्यानच कोरोनाची लागण झाली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत कर्णधाराने शानदार शतक झळकावले. त्याचवेळी उपकर्णधार रशीदनेही ९५ धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावरच टीम इंडियाने विजय मिळाला.

उपांत्य फेरीच्या सामन्यात, टीम इंडियाचे सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी आणि हरनूर सिंग यांना उपांत्य फेरीत चालता आले नाही, त्यामुळे अंतिम फेरीत या दोन्ही खेळाडूंकडून अधिक आशा असतील. या दोघांनंतर टीम इंडियाचा कर्णधार यश धुल आणि रशीद यांनी ज्या पद्धतीने डाव हाताळला तो अप्रतिम होता. अशी परिपक्वता टीम इंडियाला त्याच्याकडून अंतिम फेरीत पाहायला आवडेल.

गोलंदाजांनीही छाप पाडली आहे
विश्वचषकादरम्यान फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही छाप पाडली आहे. राजवर्धन हंगरगेकर आणि रवी कुमार यांनी आघाडीच्या फळीतील फलंदाजांना खूप त्रास दिला तर विकी ओस्तवालने आपल्या फिरकी गोलंदाजीने त्यांना साथ दिली. ओस्तवालने १०.७५ च्या प्रभावी सरासरीने १२ विकेट घेतल्या आहेत.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-

भारत- यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, गरव सांगवान, दिनेश बाणा, आराध्या यादव, राजवर्धन यादव, वासू वत्स आणि रवि कुमार.

इंग्लंड – टॉम पर्स्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जोशुआ बॉयडेन, अॅलेक्स हॉर्टन, रेहान अहमद, जेम्स सेल्स, जॉर्ज थॉमस, थॉमस ऍस्पिनवॉल, नॅथन बार्नवेल, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, विल्यम लक्सटन, जेम्स र्यू, फतेह सिंग आणि बेंजामिन क्लिफ.

अंडर-१९ विश्वचषकात सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम भारताने केला आहे. टीम इंडिया २०००, २००६, २००८, २०१२, २०१६, २०१८, २०२० आणि २०२२च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर २००६, २०१६ आणि २०२० मध्ये संघाला फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Web Title: Youngistan will win the world for the fifth time england will face india in the final of the under 19 world cup today the team has lost 37 out of 49 matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2022 | 08:59 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • U19 World Cup

संबंधित बातम्या

‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ
1

‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ

T20 World Cup 2026 : India vs Pakistan सामन्याबाबत पाकिस्तानने का केलं सरेंडर? सरकारने निर्णय बदलण्याचे कारण केले स्पष्ट
2

T20 World Cup 2026 : India vs Pakistan सामन्याबाबत पाकिस्तानने का केलं सरेंडर? सरकारने निर्णय बदलण्याचे कारण केले स्पष्ट

कन्फर्म! T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना होणार, ड्रामेबाजीनंतर पाकिस्तानचा निर्णय
3

कन्फर्म! T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना होणार, ड्रामेबाजीनंतर पाकिस्तानचा निर्णय

T20 World Cup 2026 दरम्यान केएल राहुलने घातला बॅटने धुमाकूळ! या स्पर्धेत ठोकले दमदार शतक
4

T20 World Cup 2026 दरम्यान केएल राहुलने घातला बॅटने धुमाकूळ! या स्पर्धेत ठोकले दमदार शतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.