Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतुलित आहार: निराेगी आयुष्याची गुरुकिल्ली, काय सांगतात तज्ज्ञ

Balanced Diet: हल्लीच्या धावपळीच्या जगात अनेक जण कधीही आणि कुठेही खातात. ज्याचा आरोग्यावर नक्कीच चुकीचा परिणाम होताना दिसतोय. लठ्ठपणा, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल यासारखे आजार यामुळे वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे आयुष्यात संतुलित आहार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कसा ते आपण जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 12, 2024 | 11:13 AM
वयानुसार संतुलित आहार

वयानुसार संतुलित आहार

Follow Us
Close
Follow Us:

संतुलित  आहारामध्ये आपल्या शरीराच्या कार्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे  भरपूर प्रमाणात असतात. संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक  असलेल्या  उर्जेची  गरज पूर्ण होतेच. तसेच शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पौष्टिक कमतरता  यांची ही  गरज  पूर्ण  हाेते. कारण त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वे  जसे कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी यांचा समावेश असताे.

याविषयी याविषयी बोलताना पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ संजय कुमार मिश्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  संतुलित  आहारासह  शरीराची नियमित हालचाल करणे, याेग्य वजन राखणे  यामुळे एकूणच आपले आरोग्य आणि शक्ती कायम राहते. प्रौढांमध्ये निरोगी आहार  घेण्यामुळे  चांगली प्रतिकार शक्ती  तयार होते.  त्याचबराेबर हृदय व  रक्तवाहिन्या संबंधी  रोग, टाइप 2 मधुमेह, विशिष्ट कर्करोग  यांचाही धोकाही कमी होतो. तसेच  शारिरीक  आघात आणि रोगांपासून त्वरीत बरे देखील हाेण्यास मदत हाेते. वयानुसार  विशिष्ट  पोषणाची गरज असते कसे ते आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

बाल्यावस्था (0  ते  6 महिने) 

पहिले सहा महिने आईचे दूधच पूर्णान्न

बाळाला आईच्या  दुधामध्ये  6 महिन्यांपर्यंत आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे, ऊर्जा आणि द्रव असतात. सहा महिन्यापर्यंत लहान बाळांना फक्त स्तनपान करण्याची शिफारस केली जाते.  एखाद्या  विशेष  किंवा दुर्मिळ प्रकरणात जेव्हा  आई  बाळाला दूध  पाजण्याच्या स्थितीत नसते तेव्हा त्याला पूरक आहार किंवा फॉर्म्युला  फीड  देऊ शकतो. परंतु फॉर्म्युला फीड  हा  आईच्या दुधाला  मात्र पर्याय  ठरू  शकत नाही.

सहा महिन्यानंतर हळूहळू 1 वर्षापर्यंत बाळाला आईच्या दुधासह पातळ किंवा  चावून  खाता  येउ  शकताे असा आहार घ्या आणि नंतर ताे पुढेही सुरू ठेवा. स्तनपान हे 2 वर्षांपर्यंत चालू ठेवता येते. जसजसे  ते  हळूहळू कमी होत जाते, तसतसे बाळाला संतुलित जीवनसत्व आणि खनिजयुक्त आहार द्यावा. ज्यामध्ये साध्या शिजवलेल्या डाळी आणि मसूर, दूध, दही, पनीर, अंडी, मासे, हिरव्या भाज्या, विविध प्रकारची तृणधान्ये असलेली फळे यांचा समावेश हाेताे. जास्त साखर किंवा मीठ असलेले पदार्थ टाळावे अशी शिफारस केली जाते.

हेदेखील वाचा – मल्टीविटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थाचा समावेश, शरीर राहील तंदुरुस्त

लहान मुले 

लहान मुलांचे डाएट

एकदा मुलाने घन पदार्थही खायला सुरुवात केली की, त्यांना विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे. कारण, या वयात ते सामान्यतः पूरक आहार  घेउ  शकतात. मुलांची वाढ आणि त्यांच्या शारीरिक हालचालींचा विचार करता त्यांना त्यानुसार अन्न दिले पाहिजे. जेणेकरून त्यांची प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता पूर्ण होईल. त्यांच्या आहारात तृणधान्ये, (गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, इ.) कडधान्ये आणि शेंगा फळे आणि भाज्या आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असावा.

किशोर आणि तरुणावस्था 

तरूण वयात काय खावे

या वयात, शारीरिक हालचालींना प्राधान्य दिले पाहिजे. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम अशा संतुलित आहाराचा समावेश केला पाहिजे. तसेच, आहारातील चरबी आणि  मीठयुक्त  पदार्थ प्रतिबंधित केले पाहिजेत.

हेदेखील वाचा – स्तनपान करताय! मग,आहारात हे खाल्ल्यास बाळाचं पोषण चांगलं होणारच !

ज्येष्ठ नागरीक

वयानुसार आहार घेणे आवश्यक

या वयोगटातील व्यक्तींना अनेक  समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांचे आरोग्य आबाधित  राखण्यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. रोजच्या  दिनचर्येत  शारीरिक व्यायामाचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच, दूध, दही, अंडी, मासे, शेंगदाणे आणि तेलबिया यांसारख्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी  उर्जेपेक्षा  अधिक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न घ्यावे. मजबूत  हाडांसाठी  दररोज सूर्यप्रकाशात काही मिनिटे (सकाळी 10  ते  दुपारी 2 दरम्यान) फिरावे जेणेकरून व्हिटॅमिन  डी  शरीरात  शाेषले  गले पाहिजे.

संतुलित आहार हे  कुपोषण, लठ्ठपणा आणि इतर  चयापचय विकारांपासून बचाव करण्यासाठी  एक ढाल म्हणून काम करते. म्हणूनच वयाची पर्वा न करता संतुलित आहार आणि निरोगी  जीवनशैलीला  प्राधान्य देणे हे प्रत्येकाच्या निराेगी आयुष्यासाठी आवश्यक आहे.

Web Title: A balanced diet the key to a healthy life says expert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 11:13 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
1

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
2

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
3

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

मुलांपासून वृद्धांपर्यंत लठ्ठपणाचे ठरत आहेत बळी, आयुर्वेदातील पंचकर्म उपायाने मिळेल सुटका
4

मुलांपासून वृद्धांपर्यंत लठ्ठपणाचे ठरत आहेत बळी, आयुर्वेदातील पंचकर्म उपायाने मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.