Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील ‘या’ चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

लघवी मार्गातील इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. चला तर जाणून घेऊया युटीआय इन्फेक्शनची कारणे आणि उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 23, 2025 | 10:58 AM
लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील 'या' चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील 'या' चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

२८ वर्षीय महिलेचा मृत्यू कशामुळे झाला?
युटीआय इन्फेक्शन होण्याची कारणे ?
इन्फेक्शन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

दीर्घकाळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. हे घटक लघवी, घाम आणि शौचा वाटे बाहेर पडून जातात. लघवी होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. हे चक्र शरीरात कायमच चालू असते. पण बऱ्याचदा ऑफिसमध्ये, प्रवासात किंवा सार्वजनिक ठिकाणी महिला लघवीला जाणे टाळतात. जास्त वेळ लघवी रोखून ठेवली जाते. मात्र महिलांची ही सवय शरीरासाठी जीवघेणी ठरते. जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्याच्या शरीरातील अंतर्गत अवयवांवर गंभीर परिणाम होतो. अतिशय साध्या वाटणाऱ्या सवयींमुळे एका २८ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. महिलेने जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे संपूर्ण शरीरात संसर्ग पसरला आणि उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. (फोटो सौजन्य – istock)

चालताना छातीमध्ये हलक्या वेदना होतात? हृदयविकाराचा झटका येण्याच्या १ महिना आधी शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे

जास्त वेळी लघवी रोखून धरल्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जात नाही. हे घटक शरीरात हळूहळू जमा होण्यास सुरुवात होते. मात्र काही दिवसानंतर शरीरात वाढलेल्या इन्फेक्शनमुळे जीवाला धोका निर्माण होतो. लघवीमध्ये वाढलेले यूटीआय सारखे विषाणू वेळीच बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. अन्यथा हा विषाणू लघवी मार्गातून थेट किडनी आणि नंतर रक्तात पसरतो. आज आम्ही तुम्हाला यूटीआय इन्फेक्शन होण्याची कारणे? यूटीआयपासून बचाव करण्यासाठी उपाय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

लघवी रोखल्यामुळे रक्तापर्यंत पसरणारे इन्फेक्शन:

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होती. मात्र प्रवासादरम्यान तिने खूप वेळ लघवी रोखून ठेवल्यामुळे तिला वारंवार ‘युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ होत होते. तिला या संसर्गाची लागण तिसऱ्यांदा झाली होती. तिच्यावर योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. लघवी मार्गात वाढलेले इन्फेक्शन हळूहळू संपूर्ण शरीरात पसरून रक्तात मिसळ्ते. रक्तामध्ये इन्फेक्शन पसरल्यामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होऊन जातात, ज्यामुळे जीव वाचवणे सुद्धा कठीण होऊन जाते.

युटीआय वाढण्याची कारणे:

लघवी मार्गातील इन्फेक्शन वाढण्याची अनेक कारणे आहेत. कमी पाण्याचे सेवन, नाजूक अवयवांची स्वच्छता न करणे, लघवी जास्त वेळ रोखून ठेवणे इत्यादी चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. डॉक्टरांच्या मते, कमी पाणी पिण्याची सवय शरीरासाठी घातक ठरते. यामुळे लघवीतील बॅक्टेरियाची एकाग्रता वाढते आणि संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे बाहेर कुठेही गेल्यानंतर सुद्धा भरपूर पाण्याचे सेवन करून वारंवार लघवीला जावे. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होऊन जातो.

हिवाळ्यात वाढलेला सर्दी खोकला बराच होत नाहीये? मग स्वयंपाक घरातील लसूणचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, खोकला होईल गायब

कामाच्या ठिकाणी कोणती काळजी घ्यावी:

कुठेही जाताना किंवा घरातून बाहेर पडताना लघवीला जावे. ही सवय शरीरासाठी फायदेशीर आहे. तसेच कामाच्या ठिकाणी जास्त वेळ लघवी रोखून ठेवू नये. यामुळे लघवीत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. लघवी रोखल्यामुळे मूत्राशयावर ताण येतो आणि बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात फॉलो केलेल्या छोट्या मोठ्या सवयी शरीरास घातक ठरतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: UTI म्हणजे काय?

    Ans: मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात होणाऱ्या जिवाणूंच्या संसर्गाला मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) म्हणतात.

  • Que: UTI ची लक्षणे कोणती?

    Ans: लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, वारंवार लघवीला होणे

  • Que: UTI होण्याची कारणे कोणती?

    Ans: महिलांमध्ये लैंगिक संबंधांमुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो, कारण यामुळे जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात.

Web Title: A deadly infection that spread from the urine to the entire bloodstream a 28 year old woman died due to these wrong habits at the office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestlye tips
  • women health

संबंधित बातम्या

हिवाळ्यात वाढलेला सर्दी खोकला बराच होत नाहीये? मग स्वयंपाक घरातील लसूणचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, खोकला होईल गायब
1

हिवाळ्यात वाढलेला सर्दी खोकला बराच होत नाहीये? मग स्वयंपाक घरातील लसूणचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, खोकला होईल गायब

डायलिसिस केंद्रे नाममात्र दरात संस्थांना करून देणार उपलब्ध; ३० वर्षांसाठी केला जाणार करार, पालिकेचे पीपीपी मॉडेल
2

डायलिसिस केंद्रे नाममात्र दरात संस्थांना करून देणार उपलब्ध; ३० वर्षांसाठी केला जाणार करार, पालिकेचे पीपीपी मॉडेल

केळीच्या पानांवर अन्नपदार्थांचे सेवन का करावे? जाणून घ्या केळीच्या पानांवर जेवण्याचे शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे
3

केळीच्या पानांवर अन्नपदार्थांचे सेवन का करावे? जाणून घ्या केळीच्या पानांवर जेवण्याचे शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

थंडीच्या दिवसांमध्ये ताक प्यावे का? ताक प्यायल्यानंतर पचनक्रियेवर कोणता परिणाम होतो, चुकीच्या वेळी ताक पिणे शरीरासाठी हानिकारक
4

थंडीच्या दिवसांमध्ये ताक प्यावे का? ताक प्यायल्यानंतर पचनक्रियेवर कोणता परिणाम होतो, चुकीच्या वेळी ताक पिणे शरीरासाठी हानिकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.