Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रागीट माणसांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त! रागावर तेव्हा ताबा

रागावर नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकार, पचनाचे त्रास आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 27, 2025 | 08:13 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या दैनंदिन आयुष्यात राग ही एक सामान्य भावना आहे. ती टाळणे कठीण असते, पण तिच्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राग क्षणिक असला तरी त्याचा परिणाम दीर्घकालीन असू शकतो. रागाच्या क्षणी शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. अॅड्रेनालाईन आणि कोर्टिसोल यांसारखे स्ट्रेस हार्मोन्स वेगाने वाढतात. यामुळे रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके जलद होतात आणि रक्त गोठण्याची शक्यता वाढते. हे सर्व घटक हृदयविकाराच्या झटक्याचे कारण ठरू शकतात.

गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट घरी बनवा शाही बदामाचा हलवा, नोट करून घ्या रेसिपी

२०२२ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, वारंवार रागावणाऱ्या व्यक्तींना हृदयाचे आजार होण्याचा धोका अधिक असतो. एवढेच नव्हे तर ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास झाला आहे, त्यांच्यासाठी राग आणि नैराश्य ही स्थिती अधिक धोकादायक ठरते. कारण या भावनांमुळे शरीराची रिकव्हरीची गती कमी होते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे हे हृदयासाठी संरक्षणात्मक पाऊल ठरते.

रागाचा फटका केवळ हृदयालाच बसत नाही. सततचा राग हा इम्यून सिस्टिम कमकुवत करतो. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने शरीर आजारांना बळी पडते. सततच्या रागामुळे पचनतंत्र देखील बिघडते. वारंवार अॅसिडिटी, पोटदुखी, गॅस, इरिटेबल बाउल सिंड्रोम अशा समस्या दिसू शकतात. अभ्यासानुसार, रागामुळे कोलनच्या हालचालींवर आणि पचनाच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम होतो.

IVF साठी होणाऱ्या खर्चात फरक का होतो? काय आहे कारण

याशिवाय, स्नायूंमध्ये सतत ताण निर्माण होतो. डोकेदुखी, मानदुखी, पाठदुखी अशा समस्या वाढतात. न्यूरोस्पाईनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ज्यांना वारंवार राग येतो त्यांना मान व पाठीच्या त्रासाचे प्रमाण जास्त असते. सर्वात धोकादायक बाब म्हणजे रागामुळे हृदयावर सतत ताण येतो. कॅटेकोलामाइन नावाचा हार्मोन रागाच्या वेळी जास्त प्रमाणात स्रवतो, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके दोन्ही वेगाने वाढतात. दीर्घकालीन पातळीवर हा ताण हृदयविकाराचे मोठे कारण बनतो. म्हणूनच, राग आला की खोल श्वास घेणे, ध्यानधारणा करणे, व्यायाम करणे, सकारात्मक विचारांची सवय लावणे हे उपाय उपयुक्त ठरतात. राग पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी त्यावर ताबा ठेवणे तुमच्या हृदयाच्या आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

Web Title: Angry people are more likely to have a heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 08:13 PM

Topics:  

  • heart attack awareness

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.