Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नैराश्य चिंता आणि बरचं काही ; तुमची मुलं टीनेजर आहेत का ? मग मुलांच्या ‘या’ वागण्यावर पालकांनी काय केलं पाहिजेत ?

पालकांंसाठी आव्हानात्मक घटना काय तर वयात येणाऱ्या मुलांना समजून घेणं. हल्लीच्या काळातील मुलं वयापेक्षा जास्त लवकर मोठी होताना दिसत आहेत. काळ बदलत गेला तसं तसं पालक आणि मुलांमधील नातं देखील काही प्रमाणात बदलत गेलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2026 | 05:19 PM
नैराश्य चिंता आणि बरचं काही ; तुमची मुलं टीनेजर आहेत का ? मग मुलांच्या ‘या’ वागण्यावर पालकांनी काय केलं पाहिजेत ?
Follow Us
Close
Follow Us:
  • नैराश्य चिंता आणि बरचं काही ;
  • तुमची मुलं टीनेजर आहेत का ?
  • मग मुलांच्या ‘या’ वागण्यावर पालकांनी काय केलं पाहिजेत ?
लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा असतो हा गोळा वय वाढतं, आयुष्यात येणारी चांगली वाईट माणसं यांनुसार आकार मिळत जातो. खरंतर पालकांंसाठी आव्हानात्मक घटना काय तर वयात येणाऱ्या मुलांना समजून घेणं. हल्लीच्या काळातील मुलं वयापेक्षा जास्त लवकर मोठी होताना दिसत आहेत. काळ बदलत गेला तसं तसं पालक आणि मुलांमधील नातं देखील काही प्रमाणात बदलत गेलं. आताच्या काळात पालक आणि मुलांमधील संवाद देखील कमी झालाय त्यामुळे मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं व्यसन होणं वाढत जातंय. वयाच्या 13 वर्षापासून ते 19 वर्षांपर्यंतच्या मुलांना टीनेजर म्हटलं जातं. अर्थातच ही मुलं असतात ती पौगंडावस्थेतील. सध्या अभ्यासामुळे मुलांना शाळेत असल्यापासून टॅब आणि मोबाईल हातात दिलेला असतो. याच्या वाढत्या वापरामुळे नको असलेलं ज्ञान म्हणजे इंटरनेटवरील व्हिडीओ त्यांना सहजपणे पाहायला मिळतात. या अशा वातावरणात आपल्या मुलांना वाढवावं कसं हा प्रश्न कायमच पालकांना पडतो.

वय़ोगट 13 ते 19 मध्ये मुलं असो की मुली स्वत:च्या विश्वात रमतात आणि त्याला कारणं देखील अनेक आहेत. मात्र याचवेळी पालकांची भूमिका महत्वाची असते. अशावेळी पालकांनी मुलांवर चिडचिड न करता त्यांना समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. या वयात मुलं आणि मुली यांच्यात शारीरिक आणि मानसिक झपाट्याने बदल होतात. 13 वर्षापासून मुलांच्या आवाजात बदल व्हायला सुरुवात होते. त्य़ांचा आवाज फुटतो. नैराश्य आणि सतत चिंता वाटणं, या समस्या भेडसावतात. तसंच शैक्षणिक दबाब आणि मित्र मैत्रीणींशी होणारी तुलना यामुळे शारीरीक आणि मानसिक जडण घडण होताना त्रास होतो. करियरबद्दल वाटणाऱ्या चिंता आणि यामुळे मुृलं खचतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील कमी होतो. या काळात पालकांचा पाहिजे तसा आधार मुलांना मिळाला नाही ते वाईट संगतीला लागतात.

आता यातले शारीरिक बदल कोणते ?

 

हार्मोनल बदल
चेहऱ्यावर येणारे पिंपल्स
आवाजात आणि दिसण्यातील बदल
अचानक घाम येणं
वेगाने वाढणारी शारीरिक वाढ अशा शारीरिक बदलांबरोबरच मानसिक बदल देखील होतात.

कडक उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचे पन्ह, नोट करून घ्या रेसिपी

मानसिक बदल

शारीरिक बदलाचा परिणाम मानसिकतेवर देखील होतो. मुलांना मिशी फुटणं असो किंवा मुली देखील मासिकपाळी आणि त्यामुळे होणारे बदल या सगळ्यात पौगंडावस्थेतील मुलांना सतत हा प्रश्न पडतो की, मी चांगला दिसतो का, मला मिशी फुटते ती चांगली दिसेल का ? तर मुली देखील वजन वाढणं किंवा कमी होणं यात मी कशी दिसतेय .या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या मनावर होत असतो. त्यामुळे सतत मनात चलबिचल होणं सतत कोणत्यातरी प्रश्नांनी मन ग्रासलेलं असणं या गोष्टी होतात.

पालकांची भुमिका

याचवेळी मुलांवर न ओरडता समजून घेणं, नात्यात विश्वास देणं, मुलांना न ओरडता त्यांना आई बाबा मित्र वाटायला पाहिजेत अशी संयमाची भुमिका पालकांची असायला पाहजेत, असं तज्ज्ञ कायम सांगतात. या वयातील मुलांना चांगल्या प्रकारे समजून घेतल्याल पालक आणि मुलं यांच्यात गप्पा गोष्टी होतात आणि नातं घट्ट होतं. मुलांवर चिडचिड न करता ती जास्तवेळ का झोपतायत, मुलांच्या मोबाईलचा स्क्रीन टायमिंग किती आहे याकडे लक्ष देणं पालकांची भूमिका आहे.

कमी वयातच तुमची त्वचा सैल होऊ लागली आहे का? किचनमध्ये दडलेल्या या 5 वस्तूंपासून घरीच बनवा नॅचरल सिरम

 

Web Title: Are your children teenagers what should parents do about the physical and mental changes in their children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • children story
  • lifestyle tips
  • mental health

संबंधित बातम्या

स्टीलच्य़ा बाटलीतलं पाणी चवीला वेगळं लागतंय ? तुम्ही वापरताय ती पाण्याची बाटली सुरक्षित आहे ना ?
1

स्टीलच्य़ा बाटलीतलं पाणी चवीला वेगळं लागतंय ? तुम्ही वापरताय ती पाण्याची बाटली सुरक्षित आहे ना ?

Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा
2

Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

मशरूम खाण्याचे ५ जबरदस्त फायदे; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून वजन घटवण्यापर्यंत ठरतं फायदेशीर…
3

मशरूम खाण्याचे ५ जबरदस्त फायदे; रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून वजन घटवण्यापर्यंत ठरतं फायदेशीर…

Mental Health Alert: जास्त तणाव शरीराला करतो आतून कमकुवत; जाणून घ्या गंभीर परिणाम
4

Mental Health Alert: जास्त तणाव शरीराला करतो आतून कमकुवत; जाणून घ्या गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.