Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात होऊ शकते अन्नातून विषबाधा; अन्नपदार्थांची अशी घ्या काळजी

गरमीच्या दिवसांत म्हणजेच उन्हाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामुळेच या ऋतूत खाद्यपदार्थांबाबत खूप काळजी घ्यावी लागते. आपण खाण्या-पिण्याच्या गोष्टींबाबत थोडेसे बेफिकीर राहिलो तर त्यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होऊ शकते.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 07, 2022 | 05:09 PM
उन्हाळ्यात होऊ शकते अन्नातून विषबाधा; अन्नपदार्थांची अशी घ्या काळजी
Follow Us
Follow Us:

सध्या गरमीचा प्रचंड तडाखा पाहायला मिळत आहे. गरमीच्या लाटेने दिवसा बाहेर पडणंही मुश्किल झालं आहे. अशातच उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे अन्न पदार्थ लगेच खराब होऊ शकतात. खराब झालेले पदार्थ खाल्ल्यास अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याची दाट शक्यता असते. MayoClinic च्या मते, जेव्हा विषारी जीवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी इ. आपल्या पोटात जाते. यालाच अन्नातून विषबाधा होणे म्हणतात.

गरमीच्या दिवसांत म्हणजेच उन्हाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामुळेच या ऋतूत खाद्यपदार्थांबाबत खूप काळजी घ्यावी लागते. आपण खाण्या-पिण्याच्या गोष्टींबाबत थोडेसे बेफिकीर राहिलो तर त्यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होऊ शकते.

अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे

अन्नातून विषबाधेमुळे, व्यक्तीला थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. यासोबतच उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखीही होऊ शकते. तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही, कारण छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्वतःला यापासून वाचवू शकता. सामान्यतः अन्नातून विषबाधा होण्याची समस्या गंभीर नसते, परंतु काही वेळा यामुळे लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागते.

अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी काय

  • जेवायला गेल्यावर जेवणाची जागा आणि वापरलेली भांडी स्वच्छ असावीत.
  • उन्हाळ्याच्या हंगामात कोरड्या मसाल्यांमध्ये आणि धान्यांमध्ये बुरशी सहजपणे वाढू शकते, म्हणून ते वापरण्यापूर्वी काळजी घ्या.
  • बॅक्टेरिया आणि बुरशीपासून बचावासाठी फराळ, बिस्किटे, विविध पदार्थ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. त्यांना ओल्या हाताने किंवा चमच्याने स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
  • पॅकींग केलेल्या वस्तूंची एक्सपायरी डेट नेहमी तपासा. शिवाय जुन्या मसाल्यांना बुरशी आली असेल तर लगेच फेकून द्या.
  • रोज वापरले जाणारे पीठ किंवा बेसन फक्त एअर टाईट डब्यात ठेवा.
  • कणिक, उरलेल्या भाज्या, चटणी, कोशिंबीर इत्यादी फ्रीजमध्ये ठेवा.
  • टोमॅटो, टरबूज, संत्री, दही, दूध इत्यादी नेहमी फ्रीझरमध्ये ठेवा.
  • उन्हाळ्यात घरचे दही आणि चटणी खावी, बाहेरची खरेदी करून खाणे टाळावे.
  • जेव्हा तुम्ही चाकू वापरता तेव्हा तो वापरण्यापूर्वी आणि नंतर साबणाने स्वच्छ केल्यानंतरच वापरा.
  • जेवण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने चांगले धुवा.
  • शिजवलेल्या अन्नाजवळ कच्चे मांस फ्रीजमध्ये ठेवू नका. असे केल्याने बॅक्टेरिया शिजवलेले अन्न खराब करू शकतात.
  • स्वयंपाकघरात लाकडी भांडी जसे की चकला-बेलन इत्यादी चांगल्या प्रकारे धुऊन वाळवल्यानंतरच ठेवा. कारण त्यात बुरशीची वाढ होऊ शकते

Web Title: Avoid food poisoning in summer season use these simple remedies nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2022 | 05:06 PM

Topics:  

  • Health Tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Kitchen Tips : स्वयंपाकघरातील या नेहमीच्या चुका पाैष्टीक अन्नालाही बनवतात अनहेल्दी, वेळीच सवयी बदला
1

Kitchen Tips : स्वयंपाकघरातील या नेहमीच्या चुका पाैष्टीक अन्नालाही बनवतात अनहेल्दी, वेळीच सवयी बदला

Kanda Bhaji: पावसाळ्यात कांदा भजी का खावीशी वाटते, कारण माहिती आहे का?
2

Kanda Bhaji: पावसाळ्यात कांदा भजी का खावीशी वाटते, कारण माहिती आहे का?

Bones: हाडांमध्ये सतत वेदना होत असतील तर दुर्लक्ष करू नका; वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या
3

Bones: हाडांमध्ये सतत वेदना होत असतील तर दुर्लक्ष करू नका; वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या

मुंबईतील सरकारी रुग्णालयांत रक्तटंचाई; थॅलेसेमिया, कर्करोग रुग्णांपुढे मोठे संकट
4

मुंबईतील सरकारी रुग्णालयांत रक्तटंचाई; थॅलेसेमिया, कर्करोग रुग्णांपुढे मोठे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.