Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवताना केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतील अतिशय धोकादायक, कायमच दुर्लक्ष केल्यामुळे आतड्यांच्या होतील चिंध्या

चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. अपचन, आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे अन्नपदार्थांचे सेवन करताना या चुका अजिबात करू नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2025 | 11:44 AM
जेवताना केलेल्या 'या' चुका शरीरासाठी ठरतील अतिशय धोकादायक

जेवताना केलेल्या 'या' चुका शरीरासाठी ठरतील अतिशय धोकादायक

Follow Us
Close
Follow Us:
  • अन्नपदार्थ जेवताना कोणत्या चुका करू नये?
  • जेवण्याची योग्य पद्धत कोणती?
  • आतड्यांचे नुकसान कशामुळे होते?

चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे बऱ्याचदा संपूर्ण आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे स्वतःची तब्येत कायमच निरोगी ठेवणे हे आपल्याला हातात असते. बऱ्याचदा अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणात जंक फूडचे सेवन केले जाते. मात्र सतत जंक फूड आणि तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. जेवणताना कळत नकळत केलेल्या चुकांमुळे संपूर्ण शरीराची पचनक्रिया बिघडू लागते. तसेच आरोग्यासंबंधित गंभीर आजार वाढू लागतात. त्यामुळे अन्नपदार्थ खाताना ते कशा पद्धतीने खाल्ले जातात, याचा परिणाम सुद्धा आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जेवताना केलेल्या कोणत्या चुकांमुळे शरीराला हानी पोहचते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयाचे सेवन, शरीराचा कानाकोपरा होईल स्वच्छ

जेवणाआधी पाण्याचे सेवन करणे:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर कधी रात्रीच्या वेळी फक्त पाणी प्यायले जाते. मात्र चुकीच्या पद्धतीने डाएट फॉलो केल्यामुळे आतड्यांचे गंभीर नुकसान होते. बऱ्याच लोकांना जेवणाआधी पाणी पिण्याची सवय असते. यामुळे पोट लवकर भरते. तसेच मेंदूला पोट भरल्याचा खोटा संकेत मिळतो. मात्र असे केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते आणि सतत भूक लागते. ज्यामुळे जंक फूड किंवा कोणतेही तिखट तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा वाढू लागते. त्यामुळे जेवणाच्या अर्धा किंवा १ तास आधी पाण्याचे सेवन करू नये. जेवल्यानंतर अर्धा तासाने पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.

जेवताना मोबाईल किंवा टीव्ही पाहणे:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जेवतांना टीव्ही पाहण्याची सवय असते. टीव्ही पाहत जेवल्यामुळे आतड्या आणि मेंदुचे कनेक्शन पूर्णपणे बिघडून जाते. ज्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. तसेच जेवताना मोबाईल किंवा टीव्ही पाहिल्यामुळे शरीराचे अतिरिक्त वजन वाढू लागते. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना टीव्ही किंवा मोबाईल पाहू नये. यामुळे पोट भरले की नाही, याचा अंदाज चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नपदार्थ खाताना केवळ जेवण न गिळता, योग्य पद्धतीने चावून खाणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. जेवणाचा आनंद घेत पदार्थ खल्लास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.

हाडांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स

जेवणानंतर प्रोबायोटिक्स न घेणे:

शरीरासाठी प्रोबायोटिक्स अतिशय महत्वाचे असतात. शरीरातील अन्नपदार्थांचे चांगल्या बॅक्टरीयाशिवाय पचन होत नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जेवण झाल्यावर प्रोबायोटिक घेणे अतिशय महत्वाचे आहे. दुपारच्या जेवणात किंवा जेवणांनंतर तुम्ही दह्याचे सेवन करू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

वाईट खाण्याच्या सवयी म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाची वेळ पाळत नाही किंवा भूक नसतानाही खाता, तेव्हा त्याला अवेळी आणि अनियमितपणे खाणे म्हणतात.जेव्हा तुम्ही अन्न व्यवस्थित चावून खात नाही आणि लवकर गिळता, तेव्हा त्याला खूप जलद खाणे म्हणतात.

वाईट खाण्याच्या सवयींचे आरोग्यावर काय परिणाम होतात?

जास्त प्रमाणात आणि अस्वास्थ्यकर पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते, ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.जलद खाणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे पचनक्रिया बिघडू शकते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यावे का?

जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळणे चांगले आहे, कारण ते पचनास त्रासदायक ठरू शकते. जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Bad eating habits these mistakes made while eating will be very dangerous for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • side effect

संबंधित बातम्या

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य
1

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय
2

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ
3

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
4

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.