Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डायरियामुळे शरीरात अशक्तपणा वाढला आहे? मग ‘या’ आयुर्वेदिक पेयाचे नियमित करा सेवन, जुलाब होतील बंद

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डायरिया होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन करू नये. तसेच डायरियाची समस्या उद्भवल्यास आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2025 | 08:41 AM
डायरियामुळे शरीरात अशक्तपणा वाढला आहे? मग 'या' आयुर्वेदिक पेयाचे नियमित करा सेवन

डायरियामुळे शरीरात अशक्तपणा वाढला आहे? मग 'या' आयुर्वेदिक पेयाचे नियमित करा सेवन

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे साथीचे आजार वाऱ्यासारखे पसरू लागले आहेत. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे किंवा दूषित पाणी, अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते आणि आजार होतात. सर्दी, खोकला किंवा ताप आल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे शरीराच्या पेशी आणखीनच कमी होऊन इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. डेंग्यू, मलेरिया झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. तसेच पावसाळ्यात प्रामुख्याने उद्भवणारा आजार म्हणजे डायरिया. डायरिया झाल्यानंतर वारंवार जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यामुळे किंवा पावसाळ्यात बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे जुलाब, उलट्या किंवा मळमळ होण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! दह्यात मिक्स करून ‘ही’ गुणकारी पावडर, शरीर आतून राहील स्वच्छ

पावसाळ्यात डायरिया होणे ही अतिशय सामान्य समस्या असली तरीसुद्धा बऱ्याचदा डायरियामुळे आरोग्य आणखीनच खराब होऊन जाते. यामुळे दिवसभरात व्यक्तीला ३ वेळांपेक्षा जास्त वेळ टॉयलेट जावे लागते. यामुळे शरीरातील पाणी पूर्णपणे कमी होते आणि बॉडी डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते. शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. पोटात वेदना, मुरडा येणे, सतत टॉयलेटला जायला लागणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डायरियापासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

डायरिया झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील खाकी गोळीचे किंवा इतर गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र या गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करू शकता. या काढ्याच्या सेवनामुळे जुलाब थांबून शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी होईल. आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी धणे, जिरं, सुंठ आणि खडीसाखर लागेल.

नसांमध्ये साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित प्या ‘हे’ पेय, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी

काढा बनवण्याची कृती:

आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी घेऊन ते गरम करून घ्या त्यानंतर त्यात धणे, जिरे, खडीसाखर आणि सुंठ टाकून १० मिनिटं व्यवस्थित उकळवून घ्या. तयार केलेले पाणी गाळून घ्या आणि सेवन करा. यामुळे जुलाब थांबतील आणि शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. आतड्यांमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे.

FAQs (संबंधित प्रश्न)

अतिसार म्हणजे काय?

अतिसार म्हणजे वारंवार पातळ किंवा पाण्यासारखे मल येणे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता (dehydration) होऊ शकते.

अतिसारावर काय उपचार करावे?

अतिसारामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे भरपूर पाणी, ओआरएस (ORS) किंवा इतर पातळ पेये प्या. केळी, पांढरा तांदूळ, टोस्ट आणि सफरचंद यांसारखे पचनास सोपे अन्न खा.

अतिसारासाठी काही घरगुती उपचार काय आहेत?

आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे अतिसाराची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. पुदिना देखील अतिसारावर उपचार करण्यासाठी एक चांगला उपाय आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Diarrhea has increased weakness in the body then consume this ayurvedic drink regularly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • gut health
  • home remedies
  • monsoon care

संबंधित बातम्या

शरीरातील ‘या’ लहान मोठ्या अवयवांमध्ये बिघाड झाल्यानंतर चेहऱ्यावर सतत येतात पिंपल्स, जाणून घ्या यावरील घरगुती उपाय
1

शरीरातील ‘या’ लहान मोठ्या अवयवांमध्ये बिघाड झाल्यानंतर चेहऱ्यावर सतत येतात पिंपल्स, जाणून घ्या यावरील घरगुती उपाय

आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी घटक एका झटक्यात पडून जातील बाहेर! नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, त्वचेला होतील फायदे
2

आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी घटक एका झटक्यात पडून जातील बाहेर! नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, त्वचेला होतील फायदे

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी
3

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी

ब्रश करूनसुद्धा तोंडाला दुर्गंधीचा घाण वास येतो? ‘हे’ उपाय केल्यास निघून जाईल तोंडाची दुर्गंधी, कायमच राहाल फ्रेश
4

ब्रश करूनसुद्धा तोंडाला दुर्गंधीचा घाण वास येतो? ‘हे’ उपाय केल्यास निघून जाईल तोंडाची दुर्गंधी, कायमच राहाल फ्रेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.