
उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांचा आनंद करा द्विगुणित! 'समर कॅम्प'मधील क्रिएटिव्हिटीमुळे मिळतील नवीन अनुभव
उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच मुलांना समर कॅम्पमध्ये पाठवण्याची पद्धत आता सर्वसामान्य झाली आहे. फक्त वेळ घालवण्यासाठी नव्हे, तर मुलांनी काहीतरी नवीन शिकाये, आत्मविश्वास वाढावा आणि स्क्रीनपासून थोडं दूर राहावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. मात्र, कोणताही समर कैम्प निवडताना केवळ नाथ किंवा जाहिरात पाहून निर्णय घेणे योग्य नाही, योग्य पडताळणी करुन त्याची निवड करावी, यासाठी काही गोष्टी आर्वजून लक्षात घ्याव्या.(फोटो सौजन्य – istock)
Water Fasting म्हणजे काय? वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल वॉटर फास्टिंगचा वेगाने ट्रेंड
कॅम्पमध्ये कोणते उपक्रम आहेत हे तपासा. मुलाला चित्रकला, खेळ, नृत्य, अभिनय किंवा तंत्रज्ञान यापैकी कोणती गोष्ट आवडते, त्यानुसार कॅम्प निवडल्यास मूल अधिक उत्साहाने सहभागी होते.कॅम्पचे ठिकाण सुरक्षित, स्वच्छ आणि सहज पोहोचण्याजोगे असावे. आपत्कालीन परिस्थितीत लगेच पोहोचता येईल असे ठिकाण निवडणे योग्य ठरते.
कॅम्पमध्ये काम करणारे शिक्षक किंवा प्रशिक्षक अनुभवी आहेत का, ते मुलांशी कसे वागतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रेमळ आणि समजूतदार प्रशिक्षक मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतात. कॅम्पमध्ये वैद्यकीय मदत किंवा इतर आपत्कालीन सुविधा उपलब्ध आहेत का, याची खात्री करून घ्यावी. ही गोष्ट मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे
कॅम्पची फी आपल्या बजेटमध्ये बसते का आणि वेळ मुलासाठी योग्य आहे का हे तपासा. जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या. जर पहिल्यांदाच मुलाला समर कॅम्पला पाठवत असाल, तर तो अनोळखी लोकांमध्ये राहण्यास तयार आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. कॅम्पमध्ये काय होईल, त्याचा काय फायदा होईल हे मुलाला आधी समजावून सांगणे गरजेचे आहे.
Ans: समर कॅम्प म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी आयोजित केलेला शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा कार्यक्रम होय.
Ans: कला, हस्तकला, क्रीडा, संगीत, नृत्य, व्यक्तिमत्व विकास आणि टीमवर्क यासारख्या विविध कौशल्यांचा विकास होतो.
Ans: साधारणपणे ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी समर कॅम्प उपयुक्त असतो.