Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत अ‍ॅसिडिटी होते? ‘या’ वेळी चुकूनही करू नका फळांचे सेवन, शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप आवडतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. मात्र चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2025 | 11:32 AM
रिकाम्या पोटी फळे खाण्याचे फायदे आणि तोटे:

रिकाम्या पोटी फळे खाण्याचे फायदे आणि तोटे:

Follow Us
Close
Follow Us:

फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. रोजच्या आहारात हंगामी फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. मात्र अजूनही नेमकं कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे किंवा कोणत्या वेळी फळांचे सेवन करू नये? यामध्ये अनेक समज गैरसमज आहेत. अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी फळे खाणे फायद्याचे मानतात कारण रिकाम्या पोटी फळे खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि आरोग्य सुधारते. तर काहींच्या मते दुपारच्या वेळी फळे खाणे योग्य आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कायमचा होईल गायब! आहारात ‘या’ मसाल्याच्या पदार्थाचे सेवन, पोट राहील स्वच्छ

प्रत्येक फळांमध्ये वेगवेगळे पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे त्यांच्या सेवनामुळे आरोग्याला फायदेसुद्धा होतात आणि तोटेसुद्धा होतात. चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात फळांचे सेवन करताना शरीराला पचन होणाऱ्याचं फळांचे सेवन करावे. पचनसंस्था बिघडल्यानंतर संपूर्ण शरीरालाच हानी पोहचते.

रिकाम्या पोटी फळे खाण्याचे फायदे आणि तोटे:

वाढलेले वजन कमी करताना किंवा इतर वेळी आरोग्य सुधारण्यासाठी फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी फळांचे सेवन करावे. केळी, सफरचंद, संत्री इत्यादी फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच आरोग्य सुधारते. नियमित २ केळी खाल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. मात्र या पोटी रिकाम्या पोटी आंबट फळांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते.

दुपारी फळे खाण्याचे फायदे आणि तोटे:

दुपारच्या जेवणाआधी किंवा जेवणानंतर अनेक लोक फळे खाण्याचा सल्ला देतात. दुपारच्या जेवणाआधी फळांचे सेवन केल्यामुळे भूक नियंत्रणात राहते. जास्त भूक लागत नाही. त्यामुळे वाढलेल्या वजनाने त्रस्त असलेली लोकांनी दुपारच्या जेवणाआधी फळांचे सेवन करावे. दुपारच्या वेळी शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊन जाते, अशावेळी शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी फळांचे सेवन करावे. मात्र दुपारच्या जेवणानंतर फळांचे सेवन केल्यामुळे पोटासंबंधित समस्या किंवा पचनक्रिया बिघडू शकते.

जीवनशैलीतील बदलांमुळे थायरॉईड कर्करोगाच्या प्रमाणात वाढ, सुरुवाच्या टप्प्यात निदान झाल्यास वाढेल जगण्याचा दर

संध्याकाळी फळे खाण्याचे फायदे आणि तोटे:

संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं छोटी मोठी भूक लागते. अशावेळी अनेक लोक बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ आणून खातात. मात्र नेहमी नेहमी तिखट पदार्थ खाण्याऐवजी फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे शरीर ताजेतवाने राहते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात सफरचंद, पपई, केळी, बेरीज, द्राक्ष इत्यादी पौष्टिक फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे पचनक्रिया निरोगी राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Health tips suffering from frequent acidity avoid fruits prevent serious health issu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy fruits
  • side effect

संबंधित बातम्या

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय
1

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ
2

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
3

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
4

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.