
तुम्हाला माहितेय का, आरशाचं देखील एक रहस्य आहे रहस्य नकारार्थी आपण म्हणू शकतो. एक प्रकारे आऱशाला श्राप असल्यासाख्या काही गोष्टी आहेत. तर गोष्ट अशी की, काही ठिकाणी विशेषत: ज्यू समाजात घरात जर कोणाचं निधन झालं तर आरसे झाकले जातात. असं का तर, अशी मान्यता आहे की, एखाद्या व्यक्तीचं निधन होतं त्यावेळी त्या शरीरातून आत्मा बाहेर पडलेला असतो. तो आत्मा काही काळ त्या वास्तूत फिरत असतो. त्यामुळे होतं काय तर आत्म्य़ाने चुकून जरी आरसा पाहिला तर तो आरशात अडकून पडतो किंवा पुन्हा शरीरात प्रवेश करण्यासाठी धडपडत असतो, अशी ज्यू समाजाची मान्यता आहे.
ज्यूंमध्ये शोकसमारंभात आरसा पाहू नये असं म्हणतात. एक प्रकारे हा दुखवटा पाळला जातो. आरसा झाकून ठेवण्यामागे विविध विचार मांडण्यात येतात. अशी देखील एक दंतकथा सांगितली जाते की, रात्रीच्या वेळी आरसा पाहू नये याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा अत्यंत प्रभावी असतात. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी आरशात पाहता एका वेळानंतर असं वाटायला लागतं की, आरशात पाहत असलेली व्यक्ती नक्की मीच आहे ना की दुसरं कोणी ? हे प्रतिबिंब नक्की माझंच आहे की माझ्यासारखी दिसणारी दुसरी व्यक्ती ? त्यामुळे असं म्हटलं जातं की, मृत्यूनंतरही काही काळासाठी (तेराव्यापर्यंत) मृत व्यक्तीचा आत्मा आसपासच घुटमळत असतो.
जर या आत्म्याने आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले, तर तो त्या प्रतिबिंबात अडकून पडू शकतो आणि त्याला मुक्ती मिळण्यास (पुढचा प्रवास करण्यास) अडथळा निर्माण होऊ शकतो. शोकग्रस्त घरात नकारात्मक ऊर्जा किंवा दुष्ट शक्तींचे वास्तव्य वाढू शकते, असे मानले जाते. आरसे या नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकतात, म्हणून त्यांना झाकून ठेवले जाते. मृत व्यक्तीला आपल्या शरीराचा मोह राहू नये आणि तिने या जगाशी असलेला संबंध तोडून परलोकाकडे जावे, यासाठी आरसे झाकले जातात. आरशात स्वतःला पाहणे हे स्वतःच्या रूपात मग्न राहण्याचे लक्षण मानले जाते. दुःखाच्या वेळी स्वतःचे प्रतिबिंब पाहणे अशुभ समजले जाते, कारण त्या क्षणी स्वतःच्या सौंदर्यापेक्षा मृतात्म्याला आदर देणे महत्त्वाचे असते असं म्हटलं जातं.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)