Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Fadnavis वयाच्या 46 व्या वर्षीही अभिनेत्रींना फिटनेसच्या बाबतीत देत आहेत मात! ‘या’ प्रभावी पेयाचे सेवन ठेवेल फिट

अमृता फडणवीस कायमच हेल्दी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर हळद आणि काळीमिरी कोमट पाण्यात मिक्स करून सेवन करतात. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 25, 2025 | 11:37 AM
Amruta Fadnavis वयाच्या 46 व्या वर्षीही अभिनेत्रींना फिटनेसच्या बाबतीत देत आहेत मात!

Amruta Fadnavis वयाच्या 46 व्या वर्षीही अभिनेत्रींना फिटनेसच्या बाबतीत देत आहेत मात!

Follow Us
Close
Follow Us:

अमृता फडणवीस सकाळी उठल्यानंतर कोणत्या पेयांचे सेवन करतात?
अमृता फडणवीस यांच्या फिटनेसचे रहस्य?
हळद काळीमीरीचे पाणी पिण्याचे फायदे?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सौंदर्य आणि फिटनेसमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठा आहे. कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. वजन वाढल्यानंतर सकाळी उठून जिऱ्याचे पाणी किंवा इतर डिटॉक्स ड्रिंकचे सेवन केले जाते. आजकाल सर्वच अभिनेत्री निरोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन करतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिऱ्याचे किंवा हळदीचे पाणी प्यायल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येण्यासोबतच पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अमृता फडणवीस कोणत्या प्रभावी पेयाचे सेवन करतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दिवसाची सुरुवात हेल्दी पेय पिऊन झाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर उपाशी पोटी करा ‘या’ हर्बल टी चे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

अमृता फडणवीस दिवसाची सुरुवात या पेयाने करतात:

अमृता फडणवीस सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात काळीमिरी पावडर आणि हळद मिक्स करून पितात. हे पेय नियमित प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. यामुळे शरीर स्वच्छ आणि हलके होण्यास मदत होते. आरोग्याची काळजी घेण्याचा हा अतिशय सोपा आणि गुणकारी मार्ग आहे. स्वयंपाक घरातील अतिशय साध्या पदार्थांचा शरीरावर मोठा परिणाम दिसून येतो. हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर स्वच्छ होते.

हळदीचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे:

जेवणातील सर्वच पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. जेवणात हळद टाकल्यास पदार्थाच्या रंगासोबतच चव सुद्धा सुधारते. हळदीमध्ये असलेले करक्यूमिन शरीर आतून स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेला आलेली सूज, शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी करण्यासाठी हळदीचे पेय गुणकारी ठरेल. रिकाम्या पोटी कोमट पाण्यात हळद मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

काळीमीरीचे सेवन करण्याचे फायदे:

काळीमिरी चवीला अतिशय तिखट असते. पण औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली काळीमिरी शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये पायपरीन नावाचा घटक आढळून येतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काळीमीरीचे सेवन करावे. काळीमिरीची पावडर महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात काळीमिरीचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.

पचनक्रिया राहील कायमच निरोगी! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा हेल्दी डिटॉक्स ड्रिंक, त्वचेच्या सौंदर्यात पडेल भर

रोगप्रतिकारशक्ती सुधारते:

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी कोमट पाण्यात हळद आणि काळीमिरी पावडर मिक्स करून प्यावी. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला ऊर्जा देण्यासोबतच सांधेदुखी आणि वेदनांपासून आराम मिळवून देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सकाळचे सर्वोत्तम पेय कोणते आहे?

    Ans: सकाळी लिंबू आणि मधाचे कोमट पाणी पिणे पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

  • Que: उपाशीपोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत?

    Ans: उपाशीपोटी पाणी प्यायल्याने चयापचय वाढतो, पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात मदत होते.

  • Que: सकाळचे पेय का प्यावे?

    Ans: सकाळच्या पेयामुळे दिवसाची चांगली सुरुवात होते आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळते.

Web Title: How devendra fadnavis wife amruta fadnavis age of 46 beats actresses in fitness tips in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Amruta Fadanvis
  • fitness secret
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

स्वयंपाक घरातील चिमूटभर दालचिनी झपाट्याने कमी करेल पोटावर वाढलेला चरबीचा घेर! जाणून घ्या शरीराला होणारे वेगवेगळे फायदे
1

स्वयंपाक घरातील चिमूटभर दालचिनी झपाट्याने कमी करेल पोटावर वाढलेला चरबीचा घेर! जाणून घ्या शरीराला होणारे वेगवेगळे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.