Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणानंतर लगेच पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या जेवल्यानंतर कधी आणि किती वेळाने करावे पाण्याचे सेवन

पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीर हायड्रेट राहते, विषारी घटक बाहेर पडून जातात. जाणून घ्या शरीरातील तीन दोषानुसार पाण्याचे सेवन कधी करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 23, 2025 | 11:22 AM
जेवणानंतर लगेच पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या जेवल्यानंतर कधी आणि किती वेळाने करावे पाण्याचे सेवन

जेवणानंतर लगेच पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या जेवल्यानंतर कधी आणि किती वेळाने करावे पाण्याचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते आणि आरोग्य बिघडते. कमी पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीराला हानी पोहचते. काहींना जेवताना भरपूर पाणी पिण्याची सवय असते तर काहींना जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे मंदावते. आयुर्वेदानुसार, जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय शरीरासाठी धोकादायक ठरते. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होत नाही, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये.वात, पित्त, कफ हे तीन दोष मानवी शरीरात आढळून येतात. त्यामुळे शरीरात कोणताही एक दोष वाढल्यानंतर शरीराचे संतुलन बिघडून जाते.(फोटो सौजन्य – istock)

शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ भाज्यांच्या रसाचे सेवन, महिनाभरात दिसून येईल फरक

योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाण्याचे सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील आणि आरोग्य सुधारेल. पाणी पिण्याचे योग्य नियम फॉलो केल्यास शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते, थकवा अशक्तपणा कमी होतो आणि आरोग्य सुधारते. लहान भागवण्यासाठी उभं राहून पाणी पिण्याची सवय अतिशय चुकीची सवय आहे. याचे चुकीचे परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला जेवणानंतर कधी पाणी प्यावे? पाणी पिण्याची योग्य पद्धत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे नियम फॉलो केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही.

वातानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत:

ज्या व्यक्तींच्या शरीरात वात दोष असेल अशांनी जेवणानंतर उबदार पाणी प्यावे. वात थंड आणि कोरडा आल्यामुळे उबदार पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते, शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि पोट कायमच हलके वाटते. स्नायूंवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी आणि शरीराचे कार्य कायमच संतुलित राहण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते आणि खाल्ले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत.

पित्तानुसार पाणी पिण्याची पद्धत:

अतिमसालेदार किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त वाढतो. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे आरोग्याला हानी पोहचते. वारंवार ऍसिडिटी, गॅस, अपचन इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे उबदार आणि तापमानाशी संतुलित असलेले पाणी प्यावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे अन्ननलिकेमध्ये जास्त पित्त तयार होत नाही. तसेच रक्तभिसरण सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.

कफ दोषानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत:

ज्या व्यक्तींच्या शरीरात कफ असेल अशांनी कायमच उबदार आणि मिसळलेल्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीराचे कार्य सुधारते. शरीर हलके वाटू लागते. नियमित भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे पोट स्वच्छ राहते, स्नायूंवरील तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

Dangerous Food For Heart: दिसायला हेल्दी पण हृदयाचे शत्रू आहेत ‘हे’ 5 पदार्थ, खाल्ल्यास Heart Attack येणारच!

FAQs (संबंधित प्रश्न)

पाणी पिण्याचे फायदे:

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने चयापचय (metabolism) सुधारण्यास मदत होते. कोमट पाणी चयापचय वाढवते आणि चरबीच्या पेशी विरघळण्यास मदत करते.

पाणी पिण्याच्या योग्य पद्धती:

पाणी एका दमात पिण्याऐवजी हळू हळू घोटघोट प्यावे. यामुळे लाळेतील पाचक घटक पाण्यात मिसळतात आणि पचनास मदत होते. जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य नाही. जेवणाच्या मध्ये थोडे अंतर ठेवावे.

सुरक्षित पाणी कसे मिळवावे?

जर पाणी बाटलीबंद नसेल तर ते किमान एक मिनिट उकळा. ढगाळ पाणी उकळण्यापूर्वी स्वच्छ कापडाने किंवा कॉफी फिल्टरने गाळून घ्या. क्लोरीन, शिसे आणि बॅक्टेरियासारख्या दूषित घटकांना काढून टाकण्यासाठी चांगल्या प्रतीचे वॉटर फिल्टर वापरा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: If you drink water immediately after a meal stop know when and how often to drink water after meals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • drinking water tips
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय
1

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

आईच्या गर्भाशयात बाळ नऊ महिने का राहते? जाणून घ्या मनुष्याला जन्म घ्यायला 9 महिना का लागतात
2

आईच्या गर्भाशयात बाळ नऊ महिने का राहते? जाणून घ्या मनुष्याला जन्म घ्यायला 9 महिना का लागतात

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण
3

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण

हिवाळ्यात नियमित करा सुपरफूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे सेवन,शरीरात कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता
4

हिवाळ्यात नियमित करा सुपरफूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे सेवन,शरीरात कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.