सकाळच्या नाश्त्यात केलेले 'हे' बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अॅसिडिटीपासून मिळेल आराम
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण सहज बाहेर पडून जाईल.
ओट्समध्ये विरघळणारे फायबर आढळून येतात, ज्यामुळे पोट स्वच्छ होते. ओट्स खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. ओट्स खाल्ल्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पपई किंवा पपई स्मूदी प्यावी. पपई आणि किवी सारख्या फळांमध्ये एंजाइम असतात जे पचन सुधारतात आणि पोटफुगीच्या त्रासापासून सुटका मिळवून देतात. याशिवाय नियमित वाटीभर फळे खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहील.
रात्रभर भिजवून ठेवलेल्या चिया बियांमध्ये फायबर आणि ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असतात. पोटाला आराम देण्यासाठी सकाळी उठल्यानंतर चिया सीड्सचे पाणी प्यावे.
अॅव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी, फायबर आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही अॅव्होकॅडो टोस्ट बनवून खाऊ शकता.
आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नियमित नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.