
कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण
भारतामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना झोपेच्या कमतरतेचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. भारतसह १३ देशांमध्ये करण्यात आलेल्या ‘ग्लोबल स्लीप सर्वे २०२६ नुसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मानसिक तणावाचा थेट परिणाम महिलांच्या झोपेच्या गुणवत्तेवर होत आहे. सर्वेक्षणानुसार, भारतात २९% पुरुष आणि ३८% महिला झोपेच्या तक्रारी करतात. जागतिक स्तरावर पाहिल्यास ४८% महिला आणि ४२% लागत सांगतात. पुरुष शांत झोप लागत नसल्याचे सांगतात आठवड्यातून एक-दोन रात्री जागून काढतात.(फोटो सौजन्य – istock)
वाढत्या वयात आनंदी आणि तणावमुक्त राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, वृद्धकाळ जाईल आनंदात
झोपेबाबतची जागरूकता आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत दिसून येते. भारतात ४४% लोक चांगल्या झोपेला आहार आणि व्यायामाइतकेच महत्त्वाचे मानतात. असे असूनही केवळ ५३ % भारतीय आठवड्यातून फक्त ४ कमी वेळ सुखाची झोप घेऊ शकतात. यामागील मुख्य कारणे तणाव (३९%), कामाचा भार (३७%) आणि घरगुती कर्तव्ये (३१%) ही आहेत. झोपेच्या कमतरतेमुळे लोक दिवशी तणावात असतात, तर ३५% लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. ७१% नोकरदार भारतीयांचे असे मानणे आहे की, अपुऱ्या झोपेमुळे त्यांची एकाग्रता आणि कामाची क्षमता कमी होते. इतकेच नाही तर, अनेकजण खराब झोपेमुळे आजारपणाचे निमित्त करून सुट्टी घेतात.
नोकरीवरून आल्यावरही घरातील कामाची आणि मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी महिलांवर असल्याने त्यांना विश्रांतीसाठी वेळ कमी मिळतो.राष्ट्रीय अंग आणि ऊतक प्रत्यारोपण संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतसह जगभरात दर पाच अंगदात्यांपैकी ३ ते ४ करण्णा यामध्ये पाचपैकी बार पुरुष असतात. सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव असे की, महिला अधिक प्रमाणात अवयव दान करतात, परंतु स्वतः ला गरज भासल्यास त्यांना अवयव मिळण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे.
झोप घेण्यास अडचण येणे
तणाव व चिंतेमुळे झोप खंडित होणे
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे झोप उडणे