Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीराच्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष केल्यास येईल हार्ट अटॅक किंवा स्ट

संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याचे काम रक्तवाहिन्या करतात. मात्र शरीरातील कोणतीही नस ब्लॉक झाल्यानंतर अतिशय गंभीर लक्षणे दिसू लागतात. जाणून घ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची कारणे आणि लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 10, 2025 | 01:18 PM
शरीराच्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे

शरीराच्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे का निर्माण होतात?
रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची कारणे?
हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?

मानवी शरीरात असंख्य रक्तवाहिन्या असतात. दीर्घकाळ जिवंत राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक नस मोकळी असणे महत्वाचे आहे. रक्तवाहिन्यांमधून संपूर्ण शरीराला रक्तप्रवाह होतो. रक्तवाहिन्या म्हणजे शरीरातील अशा नलिका आहेत, ज्या धमन्या हृदयाकडून शरीराकडे ऑक्सिजनयुक्त रक्त पोहचवतात आणि शिरा शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त परत आणतात. ही प्रक्रिया संपूर्ण शरीरात कायमच होत असते. रक्तप्रवाहाच्या क्रियेत अडथळे निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. वाढलेले वय, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, शिरांवर पडलेल्या अतिरिक्त दबावामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. (फोटो सौजन्य – istock)

रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालातंराने शेवटच्या टप्प्यात धोकायदाक लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे वेळीच न ओळखल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक, व्हेरिकोज व्हेन्स, अ‍ॅन्यूरिझम इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांसंबंधित झालेल्या गंभीर आजारांवर वेळीच उपचार न केल्यास कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.

पोटात कुजलेल्या घाणीमुळे कायमच जडपणा जाणवतो? सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

विचित्र थकवा, अशक्तपणा:

हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. याशिवाय शरीरात विचित्र थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे, सतत अंथरुणांवर झोपू राहावे असे वाटणे, थोडं चालल्यानंतर लगेच दम लागणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात. महिलांमध्ये ही लक्षणे अतिशय लवकर दिसू लागतात. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर हृदय आणि स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही.

छातीमध्ये दबाव जाणवणे:

अवरोधित रक्तवाहिन्यांमुळे शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण छातीत दाब जाणवणे, जडपणा वाटणे किंवा काहीवेळा छातीवर कोणतीही जड वस्तू आणून ठेवली आहे, असे वाटू लागते. हृदयाला आवश्यक प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत दाब पडल्यासारखे वाटू लागते.

हातपाय थंड पडणे:

शरीराचा रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर सगळ्यात आधी पायांमध्ये लक्षणे दिसू लागतात. पाय बर्फासारखे थंड पडणे, सुन्नपणा किंवा मुंग्या येणे, जखमा लवकर बऱ्या न होणे, पायावरील त्वचेचा रंग फिका पडणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना:

रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर केवळ छातीमध्येच नाहीतर जबडा, डावा हात, पाठ, खांदा आणि दातांमध्ये वेदना वाढू लागतात. कोणत्याही कारणांशिवाय विनाकारण हात किंवा जबड्यात वेदना होत असतील, तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे. मज्जातंतू शरीराच्या इतर अवयवांना जोडलेला असल्यामुळे मेंदूला वेदनाची जागा व्यवस्थित ओळखता येत नाही, ज्याचा परिणाम शरीराच्या कोणत्याही अवयवांवर होतो.

थंडीत पायांना पडलेल्या भेगांमधून सतत रक्त येतं? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा आवर्जून करा वापर, पाय होतील मुलायम

रक्तवाहिन्यांमधील अडथळा टाळण्यासाठी उपाय:

रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले अडथळे टाळण्यासाठी दैनंदिन आहारात कमीत कमी मीठ आणि साखर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच नियमित ३० मिनिटं व्यायाम, तंबाखू आणि अल्कोहोलपासून दूर, साखरेवर नियंत्रण ठेवणे अतिशय महत्वाचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?

    Ans: पायाच्या सुजलेल्या, पिळलेल्या आणि त्वचेखाली दिसणाऱ्या शिरा आहेत, ज्यात रक्त जमा होते.

  • Que: व्हेरिकोज व्हेन्स लक्षणे?

    Ans: पायात निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या फुगलेल्या नसा दिसणे. पायात जडपणा, सूज, खाज सुटणे किंवा जळजळ होणे.

  • Que: हार्ट ब्लॉकेज म्हणजे काय?

    Ans: कोलेस्ट्रॉल, चरबी आणि कॅल्शियम हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होते, तेव्हा प्लेक (plaque) तयार होतो. यामुळे धमन्या अरुंद होतात आणि हृदयाकडे होणारा रक्तपुरवठा कमी होतो.

Web Title: Shocking symptoms blood vessels are blocked ignoring them can cause heart attack stroke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • Blood clots
  • Health Care Tips
  • heart blockage

संबंधित बातम्या

‘या’ चविष्ट पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास किडनी होईल निकामी, उद्भवतील किडनीसंबंधित गंभीर आजार
1

‘या’ चविष्ट पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास किडनी होईल निकामी, उद्भवतील किडनीसंबंधित गंभीर आजार

गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात? गर्भाशयासंबंधित गंभीर समस्या कोणत्या कारणामुळे उद्भवतात
2

गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात? गर्भाशयासंबंधित गंभीर समस्या कोणत्या कारणामुळे उद्भवतात

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, योग्य वेळी ओळखा चेहऱ्यावर दिसून येणारे बदल
3

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, योग्य वेळी ओळखा चेहऱ्यावर दिसून येणारे बदल

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरतील शेवग्याची पाने, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
4

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरतील शेवग्याची पाने, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.